Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राजसाहेब, मला माफ करा म्हणत केली आत्महत्या

Webdunia
सोमवार, 17 ऑगस्ट 2020 (10:35 IST)
किनवट येथील मनसेचे शहरप्रमुख सुनील आनंदराव ईरावार यांनी स्वत:च्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी ईरावार यांनी लिहिलेल्या ‘सुसाईड नोट’ मध्ये ‘अखेरचा जय महाराष्ट्र’ करून राजकारण करण्यासाठी माझी आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळे मी माझे जीवन माझ्या मनाने संपवत आहे. तरी माझ्यामुळे कोणालाच त्रास देऊ नका, असा उल्लेख केला आहे.
 
सुसाईड नोटमध्ये आई मला माफ कर असे लिहित नंतर संपूर्ण कुटुंबियांची माफी मागितली आहे. तसेच पत्रात मनसेप्रमुख राज ठाकरे यांना उद्देशून लिहिले की, राजसाहेब, मला माफ करा. आमच्या येथे पैसा आणि जात या गोष्टीवर राजकारण आहे आणि दोन्ही माझ्याजवळ नाही, असे म्हटले आहे. 
 
सुसाईड नोटमध्ये याप्रकारे लिहिले आहे की- 
 
“अखेरचा जय महाराष्‍ट्र“
यापुढे राजकारण करण्यासाठी माझी आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळे मी माझं यापुढील जीवन माझ्या मनाने संपवत आहे. तरी माझ्यामुळे कोणालाच त्रास देऊ नका.”
 
“राजसाहेब मला माफ करा. आमच्या येथे पैसा आणि जात या गोष्टीवर राजकारण केलं जातं आणि माझ्याकडे या दोन्ही नाहीत. 
जय महाराष्ट्र
जय राजसाहेब
जय मनसे
 
“ आई मला माफ कर
तुझाचं - सुनिल
 
आई-पप्पा, काका-काकू, मोठी वहिणी, छोटी वहिणी, शिवादादा, शंकरदादा, पप्पु दादा मला माहित आहे मी माफ करायच्या लायकीचा नाही, तरीपण तुम्ही मला माफ करशाल अशी अपेक्षा बाळगतो.
यावरून किनवट पोलिस ठाण्यात आकस्‍मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस पुढील तपास करीत आहेत. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments