Dharma Sangrah

PM मोदींचा AAP आणि TMC वर निशाणा

Webdunia
शुक्रवार, 11 फेब्रुवारी 2022 (11:56 IST)
गोवा विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेस वर जोरदार टीका केली. गोव्यातील म्हापसा येथील जाहीर सभेत बोलताना ते म्हणाले की गोव्यातील तरुणांची राजकीय संस्कृती, आकांक्षा काँग्रेसला कधीच समजल्या नाही. गोव्याबद्दल त्यांच्या मनात नेहमीच वैराची भावना राहिली.

पीएम मोदी म्हणाले की गोव्याच्या या भूमीतून प्रेरणा मिळाली की येथे लोकांशी बोलत असताना माझ्या तोंडून अचानक 'काँग्रेस-मुक्त भारत' हा शब्द बाहेर पडला. आज हाच शब्द देशातील अनेक नागरिकांचा संकल्प बनला आहे.
 
पंतप्रधान मोदी म्हणाले की गोव्यातील लोकांना आजकाल काही नवे चेहरे दिसत आहेत. काही राजकीय पक्ष गोव्याला त्यांच्या वैयक्तिक आणि राजकीय महत्त्वाकांक्षेचे लाँच पॅड मानत आहे मात्र अशा पक्षांना गोव्यातील जनतेच्या भावनाही कळत नाहीत.
 
पीएम मोदी म्हणाले क‍ि गोव्यातील जनतेला गोव्यातील लोकांसाठी काम करणारे सरकार हवे असून स्वार्थ साधण्यासाठी वापर करणाऱ्या सरकारला जनता कधीही स्वीकारणार नाही. त्या पक्षांकडे अजेंडा नाही, दूरदृष्टी नाही, गोवा समजत नाही. ते येथे आले आणि गेले पण काय घोषणा करायची हे देखील समजत नाही.
 
ते  म्हणाले की गोव्यातील जनतेलाही त्यांचे सत्य कळले असून जनतेने या पक्षांना स्पष्टपणे सांगितले आहे की, तुमची हिंसा, दंगली आणि गुंडगिरी तुमच्याकडे ठेवा. गोव्याला प्रगतीच्या मार्गावर शांततेने वाटचाल करू द्या.
 
गोव्यात टीएमसी पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे. त्याचवेळी आप देखील आपल्या बाजूने मतांचा प्रचार करत आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

८८ अयातुल्ला खमेनी अजूनही जिवंत आहेत, ही लढाई दीर्घकाळ चालेल

LIVE: छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या ११ नगरसेवक आणि कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल

परराष्ट्र धोरणावरून महाराष्ट्राचे राजकारण तापले संजय शिरसाट यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

राज्यसभा निवडणुकीवर आदित्य ठाकरे यांचे मोठे विधान: 'महाविकास आघाडीत कोणताही गतिरोध नाही म्हणाले

मुंबई आणि पुण्यातील भाविकांना महाकालेश्वर आणि उत्तर भारतातील दर्शनासाठी रेल्वे भारत गौरव ट्रेन चालवणार

पुढील लेख
Show comments