रामरक्षा स्रोत काय किंवा यंत्र काय साधकाला कल्पवृक्षाप्रमाणेच आहेत. साधकाच्या सर्वमनोकामना या योगेने पूर्ण होतात. हे तांब्याच्या पत्र्यावर उठवलेले असतात. या यंत्रामुळे साधकाच्या सर्व मनोकामना, लहान मुलांचे किरकिर करणे, गृहशांती, भूतप्रेतबाधा, नजर लागणे, असाध्य रोग बरे होणे व साधकास काहीच कमी न पडणे हे लाभ आहेत.
हे यंत्र रोजच्या पूजेत ठेवावे व त्याची नित्य पूजा करावी. या यंत्रा बरोबरच जर आपण श्री रामरक्षास्तोत्र म्हटल्याने त्याचा प्रभावच वेगळा पडतो. हे रामरक्षास्तोत्र किती श्रेष्ठ आहे, ह्याबद्दल ची एक आख्यायिका आहे. एकदा पार्वतीने भगवान शंकरांना प्रश्न केले की हे स्वामी ! विष्णू सहस्रनामाचे पुण्य मिळेल असे एकच नाम कोणते ते आपण मला सांगा. तेव्हा भगवान शंकर म्हणाले, रामं रमेशं भजे म्हणजे जो राम-राम ह्या एकाच नामाचा जाप करतो त्याला विष्णूच्या हजार नामाचे जप केल्याचे पुण्य मिळते.
भगवान शंकरानी हे स्रोत जनकल्याणासाठी बुधकौशिक ऋषींना स्वप्नात सांगितले. आणि त्यांनी ते प्रातःकाळी लिहून काढले आहे. श्री रामरक्षा हे पाठकांचे खरोखर एक कवचच आहे. या स्तोत्राच्या नियमित पाठामुळे घरातील सर्व इडा-पीडा, आधी-व्याधी दूर होतात.
हे रामरक्षेचे संरक्षण कवच सर्वांचे रक्षण करते. ह्या रामरक्षा स्तोत्रामधील 34व्या श्लोक मुलांनी दररोज 11 वेळा म्हटले तर त्यांची शैक्षणिक प्रगती होते. खरे तर ह्या संपूर्ण रामरक्षास्तोत्रचे दर रोज पठाण करायलाच हवे.