Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'गीता'मध्ये सांगितले संकटात कसे जगावे याचे रहस्य

Webdunia
बुधवार, 11 जानेवारी 2023 (07:50 IST)
सध्याच्या परिस्थितीत प्रत्येक व्यक्ती संकटाला तोंड देत आहे. भीती आणि घाबरल्यामुळे परिस्थिती अूजनच बिघडते. अशात समजूतदारपणा आणि संयम सुटल्यामुळे अधिक त्रास सहन करावा लागतो. अशात भगवत गीता मध्ये वर्णित 4 विशेष गोष्टी लक्षात घेत पुढे वाढलं पाहिजे. अशाने आपण संकटातून बाहेर पडू शकता कारण संकट काळात धैर्य असणे आवश्यक आहे.
 
1. मृत्यूपेक्षा मृत्यूची भीती जास्त
'कोणीही मरत नाही आणि कोणालाही मारले जात नाही, सर्व निमित्त मात्र आहे... सर्व प्राणी जन्मापूर्वी देहाविना होते, मरणानंतर ते देहाशिवाय असतील. केवळ मध्यकाळात शरीरातील लोक असतात, मग आपण त्यांच्यासाठी दु: खी का आहात?' कोणीही अमर बूटी खाऊन जन्माला आलेलं नाही. कोणी लवकर मरण पावेल तर कोणी उशिरा. मृत्यूची भीती पाळू नका. एक दिवस सर्वांना मरण येणार. ज्याने जन्म घेतला त्याचा मृत्यू अटळ आहे.
 
2. आत्मा अमर आहे
आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाहीत, विस्तव जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वारा सुकवू शकत नाही. येथे भगवान श्रीकृष्णाने आत्मा अमर आणि शाश्वत असल्याचे सांगितले आहे. कारण केवळ शरीर मरण पावतं आत्मा नव्हे. ज्यांचा मृत्यू होतो ते केवळ दाह त्याग करतात, ते अजून कुठे जन्म घेतात. व्यर्थची काळजी कशाला? आपण व्यर्थ का घाबरत आहात? आपल्याला कोण मारु शकेल? आत्मा जन्माला येत नाही किंवा मरत नाही.
 
3. कोणीही आमचे नाही
गीतेत श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की हे अर्जुन तू आणि मी खूप जन्म घेतले आहेत. आपण ज्याला आज आपला समजत आहात तो मागील जन्मात तुमचा नव्हता. तुझे आणि माझे खूप जन्म झाले. मला त्या सर्व जन्माविषयी माहित आहे, परंतु तुला माहित नाही.
 
4. क्रोध त्याग करा
क्रोधामुळे मनुष्याची मति भ्रष्ट होते अर्थात तो मूर्ख होतो ज्यामुळे स्मृती भ्रमित होते. स्मरणशक्तीच्या भ्रमणामुळे माणसाची बुद्धी नष्ट होते आणि जेव्हा बुद्धी नष्ट होते तेव्हा माणूस स्वतःला नष्ट करतो.
 
• गीता प्रमाणे आपण जे काही करता ते देवाला अर्पण करा. असे केल्याने आपण नेहमी जीवनमुक्त होण्याचा आनंद अनुभवाल.

संबंधित माहिती

श्री आनंदनाथ महाराज कृत श्रीगुरुस्तवन स्तोत्र

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

आरती मंगळवारची

श्री स्वामी समर्थ आरती Swami Samarth 3 Aartis

श्री स्वामी समर्थ काकड आरती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

पुढील लेख
Show comments