रामाची स्तुती करणारे स्तोत्र श्री रामरक्षा स्तोत्राचे पठण दररोज करावे असे म्हटले जाते. याने श्रीरामांचे संरक्षण तर मिळतंच, मनाला शांती आणि सकरात्मक वातावरण तयार होतं.
रोजच्या जीवनातील कुठल्याही प्रहरी रामरक्षा म्हंटली तरी प्रचंड प्रमाणात ऊर्जा तयार होते. जी स्पंदने रामरक्षेतून जागृत होतात, ती बघण्यासाठी डोळ्यांची नव्हे तर “स्वानुभव” ह्या एकमेव साधनातून याची प्रचिती येते.
रामरक्षा म्हणा जेव्हा...
एकटं वाटतंय
कुणी आजारी आहे
प्रवासात आहात
रस्त्यावरुन एकटे जात आहात
नवीन कार्याची सुरुवात करत असाल
परदेशात अनोळखी लोकांच्यात आहात
भीतीचे आणि नकारात्मकतेचे वातावरण जाणवत असल्यास
कुठल्याही संकटात असाल
आपल्या आवडत्या व्यक्तिशी भांडण झालंय
खूप वाईट वाटतंय
रडायला येतंय
दररोज रामरक्षाचे पाठ केल्याने कुठल्याही प्रकारचं ताण, नैराश्य स्पर्श करु शकणार नाही. नास्तिक असाल तरीही रामरक्षा म्हणा. देवावर विश्वास नसेल पण विज्ञानवर असेल तोच रामरक्षेवर ठेवा.
रामरक्षा असा एक रामबाण उपाय आहे जो तुम्हाला कधीच अपयशी ठरू देणार नाही. दररोज याचे पठण करुन मनाची शक्ती आपण वाढवू शकता.