गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय असून दत्तसंप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे. या ग्रंथाचे ५२ अध्याय असून ओवीसंख्या ७४९१ इतकी आहे. काही ग्रंथात ५३ अध्याय आहेत व त्यांची विभागणी ज्ञानकांड, कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केली आहे. दत्तावतार श्रीनृसिंहसरस्वती यांच्या प्रेरणेनेच गुरुचरित्र लिहिले गेले.
या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे.
या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आधीव्याधी आजार याच्या वाचनाने नष्ट होते.
याने मनुष्य दुःख मुक्त होतो.
घरामध्ये गुरूचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते.
पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात.
विशिष्ट समस्यांवर जसे लग्न, शिक्षण,करिअर, आरोग्य, यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो.
आपल्या कुंडलीतील ग्रह-नक्षत्रे, पितृ दोष, प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र एक रामबाण उपाय असल्याचे जाणकार सांगतात.