Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रात्रीच्या वेळी झाडांची आणि वनस्पतींची पाने का तोडत नाही, जाणून घ्या यामागील कारण

रात्रीच्या वेळी झाडांची आणि वनस्पतींची पाने का तोडत नाही  जाणून घ्या यामागील कारण
Webdunia
बुधवार, 19 मार्च 2025 (17:50 IST)
आपण सर्वांनी आपल्या वडिलांना रात्रीच्या वेळी झाडांची आणि वनस्पतींची पाने तोडू नयेत असे सांगतांना ऐकले आहे. पण तुम्ही कधी यामागील कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? हिंदू धर्मात प्रत्येक काम करण्यासाठी अनेक नियम ठरवण्यात आले आहे, ज्या अंतर्गत ती कामे केली जातात. मग ती जीवनशैली असो, पूजा असो किंवा नैसर्गिक काम असो. शतकानुशतके निर्माण झालेल्या अनेक परंपरा आणि नियम अजूनही समाजात पाळले जात आहे. हिंदू धर्माच्या धर्मग्रंथांमध्ये काही गोष्टींसाठी नियम दिले आहे. यापैकी एक म्हणजे सूर्यास्तानंतर झाडे आणि वनस्पतींमधून पाने आणि फुले तोडू नयेत. रात्री झाडांची पाने तोडण्यास मनाई का आहे? तर चला जाणून घेऊया की यामागील कारण काय आहे.
ALSO READ: गणपतीची 12 नावे जपल्याने दूर होतात संकट
धार्मिक आणि आध्यात्मिक श्रद्धा
हिंदू धर्मात झाडे आणि वनस्पतींना देवांच्या समतुल्य का मानले जाते. विशेषतः वड, पिंपळ, आवळा आणि तुळशी यासारख्या झाडांची पूजा केली जाते. आता अशा परिस्थितीत रात्रीच्या वेळी या झाडांची पाने तोडणे अशुभ मानले जाते, कारण ते शांती आणि देवतांचा अपमान मानले जाते. रात्रीचा काळ हा वनस्पती आणि झाडांसाठी शांतता आणि विश्रांतीचा काळ असतो.
ALSO READ: महिलांनी मारुतीची पूजा करावी की नाही ? प्रेमानंद महाराज काय म्हणतात जाणून घ्या
वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रात रात्रीच्या वेळी झाडांची आणि वनस्पतींची पाने तोडणे नकारात्मक मानले जाते. असे मानले जाते की या कृतीमुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते आणि जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात.
 
नैसर्गिक संतुलन
रात्री वनस्पती त्यांच्या पेशींमध्ये ऊर्जा साठवतात आणि श्वसन प्रक्रियेत गुंततात. जर यावेळी त्यांची पाने तोडली तर वनस्पतींच्या भौतिक प्रक्रियेत व्यत्यय येऊ शकतो. परिणामी, त्यांच्या जीवनचक्रावर परिणाम होऊ शकतो. हा रोपांसाठी विश्रांतीचा काळ आहे आणि त्यांना हानी पोहोचवल्याने त्यांच्या वाढीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. याशिवाय, सूर्य मावळताच, सर्व पक्षी झाडांवर विश्रांती घेण्यासाठी जातात. अशा परिस्थितीत, झाडांना होणारा कोणताही त्रास त्यांच्या विश्रांतीला त्रास देऊ शकतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

आरती बुधवारची

Rangpanchami 2025 होळीनंतर रंगपंचमी कधी साजरी केली जाते? मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या

Eknath Shashti 2025 एकनाथ षष्ठी २० मार्च रोजी, कशी साजरी करावी जाणून घ्या

Festivals Recipes: रंगपंचमीला बनवा सफरचंद हलवा

गृहप्रवेश आणि लक्ष्मीपूजन

सर्व पहा

नक्की वाचा

पापमोचनी एकादशी २०२५: योग्य तारीख, शुभ वेळ आणि पूजेची पद्धत जाणून घ्या

मंगळसूत्र आणि भांग भरणे विधी

शनी गोचरमुळे या ३ राशींचे भाग्य बदलेल, सूर्य आणि बुध ग्रहाच्या कृपेने ते होतील श्रीमंत

श्री अक्षरावरून मुलांची नावे अर्थासकट

तेनालीराम कहाणी : तेनाली राम आणि रसगुल्लाचे मूळ

पुढील लेख
Show comments