Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पाकची प्रतिमा ’26/11च्या हल्ल्यामुळे मलीन झाली’

Webdunia
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017 (11:23 IST)
भारतावर पाककडून करण्यात आलेल्या 26/11 च्या  हल्ल्यामुळे आपली प्रतिमा जगभरात मलीन झाली असल्याचे पाकिस्तान सांगत आहे. पाकिस्तानचे माजी परराष्ट्र सचिव रियाज मोहम्मद खान यांनी सांगितले की ,या हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या काश्मिर मोहिमेला खूप मोठे नुकसान झाले असून,जगभरात पाकिस्तानची प्रतिमा मलीन झाली आहे.26 सप्टेंबर 2008 रोजी पाकिस्तानच्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईत सागरी मार्गे घुसून दहशतवादी हल्ला केला. यात परदेशी नागरिकांसह 166 जणांचा बळी गेला होता.
 
रियाज मोहम्मद खान यांनी मुंबई हल्ल्यांवरील हे  वक्तव्य वॉशिंग्टन येथे पाकिस्तानच्या दूतावासात केले आहे. या कार्यक्रमात पाकिस्तानचे इतर महत्वाचे मुत्सद्दी अधिकारी आणि नागरिक देखील उपस्थित होते.  खान यांनी मुंबई हल्ल्याचा उल्लेख करताना आपल्या देशाची इमेज जगभरात मलीन झाली असे म्हटले आहे. यासोबतच या हल्ल्यामुळे पाकिस्तानची जगात जी इमेज तयार झाली त्यामुळे काश्मिर आणि इतर मोहिमांना मोठे नुकसान झाले असून त्याची भरपाई कधीच करता येणार नाही असेही ते म्हणाले रियाज मोहम्मद खान हे पाकिस्तानचे माजी परराष्ट्र सचिव असून सध्या ते  जॉर्जटाउन विद्यापीठात प्राध्यापक आहेत. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments