Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुलीच्या नावे खोटे फेसबुक अकाऊंट लुटले पाच लाखांना

Webdunia
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018 (09:30 IST)

फेसबुकने जाहीर केले की जगात २० कोटी फेसबुक खाती ही खोटी आहेत. याचीच प्रचीती मुंबई येथे आली आहे. दोघातील  पार्किंगच्या वादातून एकाने मुलीच्या नावाने फेसबुक अकाऊंट तयार केले तर ज्याच्यासोबत वाद झाला त्यला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून मैत्री केली होती. मग विश्वास जिंकून त्याला त्यानंतर एका ठिकाणी बोलावून  बेदम मारहाण तर केलीच सोबत  5 लाख रुपये लुटले आहे. ही  घटना चेंबूरमध्ये घडली आहे. चेंबूरच्या गव्हाणपाडा परिसरात राहत असलेल्या हितेंद्र उर्फ बाबू ठाकूर याचा डेकोरेशनचा व्यवसाय आहे. त्याला ८ जानेवारी रोजी  अनोळख्या मुलीची फेसबुक फ्रेण्ड रिक्वेस्ट आली होती. मुलगी मग नाही कोण म्हणतय मग काय त्याने  स्वीकारली . मग  दोघांचेही फेसबुक मेसेंजरवर बोलणे सुरू झाले. त्यात त्या मुलीने त्याला  गोवंडी येथे भेटण्यासाठी बोलावले होते. मुलगी बोलावतेय हे पाहून  ठाकूरही तेथे वेळेत हजर झाला. त्याला इथे एक लांबून मुलीने हात दाखवून त्याला जवळ बोलावल होते . त्याला वाटले की  तीच मुलगी आहे,  तो जवळ गेला. तेव्हा पाच ते सहा जणांच्या टोळक्याने त्याला लोखंडी रॉड आणि स्टंपने चोप त्याला चांगलाच दिला आहे. तर त्याच्याकडील ५ लाख ९२ हजार रुपयांचा ऐवज लुटला आहे.  घटनेची माहिती मिळताच च देवनार पोलिसांनी ठाकूरच्या तक्रारीवरून दरोड्याचा गुन्हा दाखल केला. यावरून पोलिसानी 3 जणांना अटक केली. इतर आरोपी फरार आहे. अतर्गत वादातून हे प्रकरण घडले होते. तेव्हा कोणी फेसबुकवर अनोळखी असेल तर दोनदा विचार करा.

 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments