suvichar

पुलावामा हल्ल्यानंतर भारतीयांना संतापापेक्षा ही अधिक ‘दुःख’ झाले होते

Webdunia
मंगळवार, 12 मार्च 2019 (10:08 IST)
सोशल मीडियावरील गतीविधींमधून जनमानसाचा मागोवा घेण्याचा अॅम्प्लिफायडॉटएआयचा प्रयत्न ~
 
सोशल मीडियाने कोट्यावधी भारतीयांना आपले मत मांडण्यासाठी एक मंच दिला आहे. पुलवामाला झालेल्या दुर्दैवी आणि घातक हल्ल्याला प्रतिक्रिया देताना भारतीय नागरिक आपल्या सोशल हॅंडल्सच्या माध्यमातून सतत आपली चिंता, विचार आणि प्रार्थना व्यक्त करत आहेत. यावेळी व्यक्त झालेल्या भावनांमध्ये संतापापेक्षा ही अधिक दुःख आढळून आले. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (एआय) उपयोग करून प्रमुख आर्टिफिशिअल इंटेलिजन्स सॉफ्टवेअर कंपनी अॅम्प्लिफायडॉटएआय (Amplicy.ai) सोशल मीडियावरील गतीविधींमधून जनमानसाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला.
 
१०० दशलक्ष फेसबुक “एंगेजमेंट्स” (टिप्पण्या, लाइक्स, प्रतिक्रिया आणि संदेश)च्या डेटासेटवर काम करून अॅम्प्लिफायडॉटएआयने दुर्दैवी हल्ल्याच्या आणि त्यावरील सरकारी प्रतिक्रियेच्या बातमीवर भारतीयांनी आपल्या भावना फेसबुकच्या माध्यमातून कशा प्रकारे व्यक्त केल्या हे जाणून घेतले. त्यांना आढळले की, मागील ३० दिवसांच्या सरसरीच्या तुलनेत हल्ल्यानंतर शुक्रवारी आणि शनिवारी एकूण वापरकर्ते सक्रिय असण्यातली वाढ १.३ पट होती ज्यात ज्यात “दुःखी” आणि “संतप्त” या भावनांचे एकत्रित प्रमाण १० पटींनी वाढले होते. टिप्पण्या आणि मेसेंजरने येणारे इनबाउंड संदेश सुमारे २.५ पटींनी वाढले त्यापैकी अॅम्प्लिफायडॉटएआय च्या एआय-प्रेरित एंगेजमेंट अॅनलायझर अनुसार नकारात्मक संदेश ५ पटींपेक्षा जास्त वाढले होते.
 
या दरम्यान 'दुःखी' प्रतिक्रियेचा वापर ५ पटींनी वाढला होता तर संतप्त प्रतिक्रेयेचा वापर २ पटींनी वाढला होता. 'हाहा' प्रतिक्रियेचा वापर नेहमीपेक्षा १/६ ने कमी झाला होता तर 'वॉव' प्रतिक्रियेचा वापर २/३ ने कमी झाला होता. तर 'हार्ट' प्रतिक्रियेचा वापर १/२ ने कमी झाला होता.   
 
या दुर्घटनेच्या संदर्भात भारतीयांना आपल्या भावना व्यक्त करणे गरजेचे वाटले, ज्यामुळे फेसबुकवर प्रचंड प्रमाणात एंगेजमेंट वाढली व त्यात सार्वजनिक टिप्पण्या आणि खाजगी संदेशांचे प्रमाण खूप वाढले. रियल टाइममध्ये झालेल्या डिजिटल एंगेजमेंटच्या वाढत्या प्रमाणाचा अर्थ लावण्यात एआय सर्वात मोठी भूमिका बाजावेल अशी अॅम्प्लिफायडॉटएआयला आशा आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

रेल्वेच्या नावाने येणाऱ्या बनावट कॉल्सपासून सावध रहा; एका चुकीमुळे तुमचे खाते रिकामे होऊ शकते- रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

LIVE: महाराष्ट्र बोर्ड परीक्षांमध्ये झालेल्या कॉपीबाबत फडणवीस सरकारने मोठी कारवाई केली

बालभारती पुस्तकांच्या बेकायदेशीर छपाईविरुद्ध महाराष्ट्र सरकार मोहीम सुरू करणार

अजित पवार विमान अपघाताच्या चौकशीबाबत चर्चा करण्यासाठी रोहित पवार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली

महाराष्ट्र बोर्ड परीक्षांमध्ये झालेल्या नक्कल विरोधात फडणवीस सरकारने मोठी कारवाई केली, १०७ केंद्रांची मान्यता रद्द केली

पुढील लेख
Show comments