Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोदी पुन्हा सत्तेत आल्यास राहुल गांधीच जबाबदार

Webdunia
शनिवार, 11 मे 2019 (14:45 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा सत्ता मिळाली तर त्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी जबाबदार असतील, असे वक्तव्य दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. राहुल उत्तर प्रदेशात सपा-बसपा युतीला, केरळात डाव्यांना, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला आणि राजधानी दिल्लीत आम आदमी पक्षाला नुकसान पोहोचवत आहेत, अशी टीका केजरीवाल यांनी केली आहे.
 
एका मुलाखतीत केजरीवाल यांनी ही टीका केली. दिल्लीत दोन दिवसांनी मतदान होणार असून त्याआधीच केजरीवाल यांनी हे वक्तव्य केल्याने तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. जे चित्र दिसत आहे त्यावरुन काँग्रेस भाजपशी नाही जणू काही विरोधकांशीच लढत आहे, असे दिसत आहे. काँग्रेसमुळे जुळून आलेल्या अनेक गोष्टी बिघडत आहेत, असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.
 
यावेळी केजरीवाल यांनी मोदींवर टीका करत प्रमुख क्षेत्रांमध्ये कोणतंही योगदान देण्यात ते असमर्थ ठरल्याचे म्हटले आहे. यामुळेच ते खोट्या देशभक्तीचे साहाय्य घेत आहेत, असा टोला त्यांनी लगावला. मोदींची देशभक्ती खोटी आहे. देशासाठी हे घातक आहे, असे यावेळी केजरीवाल यांनी सांगितले. आपले कोणतेही काम दाखवण्यासाठी नसल्यानेच मोदी मते मिळवण्यासाठी लष्कराचे साहाय्य घेत आहेत, अशी टीका केजरीवाल यांनी केली. मोदी आणि अमित शहा यांना सत्तेत येण्यापासून रोखणे आमचे एकमेव उद्दिष्ट आहे. आम्ही हे दोघे सोडून कोणालाही समर्थन देऊ, असे केजरीवाल यांनी सांगितले.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments