Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अंतर्गत कलहाला कंटाळून नागरिक सोडत आहेत आपला देश

Webdunia
अमेरिकेमध्ये कायमचा निवारा मिळविण्यासाठी तब्बल ७००० भारतीय नागरिकांनी अअर्ज केल्याचे वास्तव समोर आले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्वासित एजन्सी (रिफ्युजी एजन्सी) च्या ताज्या अहवालामधून जगाच्या पाठीवरील निर्वासितांच्या सद्यस्थितीचा हे चित्र स्पष्ट झाले आहे. सन २०१७ च्या अखेरपर्यत तब्बल ६.८ कोटी लोक जगभरातून आपली मायभूमी सोडून इतर देशात स्थाईक झाले आहेत. स्वतःच्या देशातील जातीवाद, हिंसाचार, बेरोजगारी, अंतर्गत यादवी, गरिबी, युद्धजन्य परिस्थिती आदी विविध कारणांमुळे विस्थापित लोकांची यादी वाढतच आहे. मागच्या  वर्षी जवळपास दीड कोटी लोकांनी आपला जन्मदेश सोडला आहे. 
 
भारतामधून अमेरिकडेकडे निवारा मागणाऱ्या लोकांची संख्या २०१७ च्या अखेरपर्यंत ४०,३९१ वर आहे. तर दुसरीकडे भारतामध्ये शरणार्थी लोकांची संख्या १,९७,१४६ व निवारा मागणाऱ्या लोकांचा आकडा १०,५१९ वर आहे. अंतर्गत यादवीमुळे भीषण परिस्थितीला सामोरे जात असलेल्या अफगाणिस्तानमधून सर्वांधिक १,२४,९०० लोकांनी जगभरामधील ८० देशांकडे आसऱ्यांची मागणी करत आहेत. आर्थिक आघाड्यांवरील आव्हानात्मक परिस्थितीमुळे अडचणीत सापडलेल्या व्हेनेझुएलामधील २९,९०० लोकांनी अमेरिकेकडे आसऱ्यासाठी मागणी केली आहे. म्यानमारमधून रोहिंग्यांना परांगदा होण्याची वेळ आल्याने बांगलादेशने त्यांना सहारा दिला. ही संख्या ९,३२,२०० इतकी आहे.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments