Dharma Sangrah

सामन्यातून सरकारवर टीका

Webdunia
गुरूवार, 17 जानेवारी 2019 (09:42 IST)
निवडणुकां अगदी काही दिवस शिल्लक असताना तर सरकार घोषणांचा धडाका लावते. त्यामुळे लोकांना खूश करणाऱ्या घोषणा किंबहुना लोकप्रिय निर्णयांचा धूमधडाका होलसेलात सुरू झाला की खुशाल समजावे निवडणुका जवळ आल्या आहेत, असा चिमटा काढत हेच चांगले निर्णय सत्ता मिळाल्यानंतर पहिल्या एक-दोन वर्षांत होऊ शकत नाहीत का? हा सवाल शिवसेनेने भाजप सरकारला केला आहे. निवडणुका जवळ आल्या की मायबाप मतदारराजाला म्हणजेच प्रजेला सुखावणारे निर्णय लागोपाठ घेण्याचा मोह मी मी म्हणणाऱ्या पक्षांनाही सुटत नाही, असा टोलाही ‘सामना’च्या अग्रलेखात भाजपला लगावण्यात आला आहे.
 
अग्रलेखात म्हटले आहे की लोकांना खूश करणाऱ्या घोषणा किंबहुना लोकप्रिय निर्णयांचा धूमधडाका होलसेलात सुरू झाला की खुशाल समजावे निवडणुका जवळ आल्या आहेत! सरकार मग ते कुठल्याही पक्षाचे असो, निवडणुकीच्या तोंडावर ते अंमळ अधिकच वेगाने काम करू लागते. निवडणुका जवळ आल्या की मायबाप मतदारराजाला म्हणजेच प्रजेला सुखावणारे निर्णय लागोपाठ घेण्याचा मोह मी मी म्हणणाऱ्या पक्षांनाही सुटत नाही. पुन्हा असे निर्णय घेताना समाजातील सर्वच स्तरांतील वर्गांना काही ना काही देऊन चुचकारण्याचा प्रयत्न राज्यकर्ते करीत असतात. तसेच एकंदर सध्या केंद्रात आणि राज्यातही सुरू आहे. सरकारने घेतलेल्या चांगल्या निर्णयांना विरोध असण्याचे कारण नाही, मात्र हेच चांगले निर्णय सत्ता मिळाल्यानंतर पहिल्या एक-दोन वर्षांत होऊ शकत नाहीत का, हाच काय तो कळीचा मुद्दा आहे. महाराष्ट्र सरकारने बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर अनेक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केले. त्या निर्णयांचे वार्तांकन करताना बहुतांश मीडियाने ‘निवडणूक धमाका’ असेच वर्णन केले आहे. ते पुरेसे बोलके आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: नागपूर लॉजिस्टिक्स हब बनेल

नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी मनीषा हवालदारच्या घरातून एनटीएची गोपनीय कागदपत्रे जप्त

नागपूर लॉजिस्टिक्स हब बनेल, रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

CBSE 12th Revaluation 2026: सीबीएसई बोर्डाने स्कॅन केलेल्या प्रती मिळवण्याची तारीख वाढवली, आता २५ मे पर्यंत अर्ज करता येईल

४२ नवरदेव नटूनथटून आले, पण तिथे ना मंडप होता, ना नवरी; मध्य प्रदेशात लग्नाच्या नावाखाली विचित्र सामूहिक फसवणूक

पुढील लेख
Show comments