Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सामन्यातून सरकारवर टीका

comment
Webdunia
गुरूवार, 17 जानेवारी 2019 (09:42 IST)
निवडणुकां अगदी काही दिवस शिल्लक असताना तर सरकार घोषणांचा धडाका लावते. त्यामुळे लोकांना खूश करणाऱ्या घोषणा किंबहुना लोकप्रिय निर्णयांचा धूमधडाका होलसेलात सुरू झाला की खुशाल समजावे निवडणुका जवळ आल्या आहेत, असा चिमटा काढत हेच चांगले निर्णय सत्ता मिळाल्यानंतर पहिल्या एक-दोन वर्षांत होऊ शकत नाहीत का? हा सवाल शिवसेनेने भाजप सरकारला केला आहे. निवडणुका जवळ आल्या की मायबाप मतदारराजाला म्हणजेच प्रजेला सुखावणारे निर्णय लागोपाठ घेण्याचा मोह मी मी म्हणणाऱ्या पक्षांनाही सुटत नाही, असा टोलाही ‘सामना’च्या अग्रलेखात भाजपला लगावण्यात आला आहे.
 
अग्रलेखात म्हटले आहे की लोकांना खूश करणाऱ्या घोषणा किंबहुना लोकप्रिय निर्णयांचा धूमधडाका होलसेलात सुरू झाला की खुशाल समजावे निवडणुका जवळ आल्या आहेत! सरकार मग ते कुठल्याही पक्षाचे असो, निवडणुकीच्या तोंडावर ते अंमळ अधिकच वेगाने काम करू लागते. निवडणुका जवळ आल्या की मायबाप मतदारराजाला म्हणजेच प्रजेला सुखावणारे निर्णय लागोपाठ घेण्याचा मोह मी मी म्हणणाऱ्या पक्षांनाही सुटत नाही. पुन्हा असे निर्णय घेताना समाजातील सर्वच स्तरांतील वर्गांना काही ना काही देऊन चुचकारण्याचा प्रयत्न राज्यकर्ते करीत असतात. तसेच एकंदर सध्या केंद्रात आणि राज्यातही सुरू आहे. सरकारने घेतलेल्या चांगल्या निर्णयांना विरोध असण्याचे कारण नाही, मात्र हेच चांगले निर्णय सत्ता मिळाल्यानंतर पहिल्या एक-दोन वर्षांत होऊ शकत नाहीत का, हाच काय तो कळीचा मुद्दा आहे. महाराष्ट्र सरकारने बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर अनेक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केले. त्या निर्णयांचे वार्तांकन करताना बहुतांश मीडियाने ‘निवडणूक धमाका’ असेच वर्णन केले आहे. ते पुरेसे बोलके आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, दहशतवाद संपवण्याची चर्चा... सर्व राजकीय पक्ष एकत्र आले

LIVE: महाराष्ट्रात तीव्र उष्णतेमुळे शाळा-कॉलेजच्या वेळा बदलणार

दहशतवादी तहव्वुर राणाला मोठा धक्का, न्यायालयाने त्याची याचिका फेटाळली

पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व २६ जणांना नुकसानभरपाई मिळेल-मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा

तेलंगणात १४ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले

पुढील लेख
Show comments