Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बुलडाण्याच्या मृत महिलेला तामिलनाडूत कोरोना लस

Corona vaccine to dead women in Tamil Nadu
Webdunia
बुधवार, 3 नोव्हेंबर 2021 (14:48 IST)
बुलडाण्यातील एका मृत महिलेला तमिळनाडूत कोविड लस दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. संबंधित महिलेचा सात महिन्यांपूर्वी मृत्यू झाला असताना त्यांनी तामिळनाडूमध्ये लस घेतल्याचा मेसेज आला आहे. या प्रकारामुळे महिलेचे नातेवाईक गोंधळून गेले आहेत.
 
यासोबत लसीकरण केल्याचं प्रमाणपत्र देखील पाठवण्यात आलं आहे. सखूबाई गोपाळ बरडे (75) यांचे 17 एप्रिल रोजी निधन झाले. शहरातील आढाव गल्लीत राहणार्‍या या कुटुंबात मृत महिलेचे पती गोपाळराव, मुलगा राजेश व परिवार आहे. दरम्यान, राजेश बरडे यांच्या मोबाईलवर मंगळवारी एक मेसेज आला. बरडे यांनी कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतल्याचा तो संदेश होता. सखूबाई यांचा मुलगा राजेश याने मेसेजमधील लिकंवर जाऊन सर्टिफिकेट डाऊनलोड केले असता ते तमिळानाडू राज्यातील सर्टिफिकेट आले.
 
त्यात 26 ऑक्टोबर 2021 रोजी लसीकरण झाल्याचा उल्लेख आहे. तमिळ आणि इंग्रजीत असलेले हे सर्टिफिकेय बघून सखूबाई यांच्या नातेवाईकांना धक्का बसला. या प्रकरणाने शतकोटी लसीकरण पूर्ण करणार्‍या भारतातील लसीकरणाचा गोंधळ निदर्शनास येतो.
 
विशेष म्हणजे मृत व्यक्तीला लस दिल्याची ही पहिलीच घटना नाही. तर अशाप्रकारच्या अनेक घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथील रहिवासी येथील एका मृत व्यक्तीला लस दिल्याचा मेसेज पाठवण्यात आला होता. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

प्रकाश आंबेडकर यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्र सरकारची तत्परता घाईघाईची असल्याचे म्हटले

LIVE: मुख्यमंत्र्यांनी नवीन इलेक्ट्रिक एसी बस मार्ग ए-३० ला हिरवा झेंडा दाखवला

नितेश राणे दहशतवाद्यांची भाषा बोलत आहे म्हणाले महाराष्ट्र समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबू आझमी

UPSC परीक्षा उत्तीर्ण होऊ शकली नाही, विद्यार्थिनीने गळफास घेत केली आत्महत्या

हा नवा भारत कोणालाही छेडत नाही, पण जर कोणी छेडले तर ते त्याला सोडणार नाही-योगी आदित्यनाथ

पुढील लेख
Show comments