Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अखेर जगातील पहिल्या हायपरपूलला राज्य सरकारची मान्यता किती मिनिटात कापणार मुंबई पुणे अंतर जाणून घ्या

Webdunia
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019 (17:01 IST)
आर्थिक राजधानी मुंबई येथून फक्अत अर्ध्या तासात सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे गाठण्याचं स्वप्न येत्या काही वर्षांत प्रत्यक्षात उतरणार असून, विमानाने नव्हे, तर ‘हायपरलूप’ च्या माध्यमातून ही दोन शहरं केवळ 31 मिनिटांच्या अंतरावर जोडली जाणार आहे. राज्य सरकारने ‘वर्जिन हायपरलूप’ व ‘डीपी वर्ल्ड’ यांच्या कराराला पूर्ण  मान्यता दिली. जगातील पहिला हायपरलूप ट्रॅक मुंबई आणि पुणे या दोन शहरांदरम्यान सुरु होणार आहे. या हायपरलूप प्रकल्पामुळे मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या वेळेची फार मोठी  बचत होणार आहे. तर रोजगाराच्या हजारो  संधी उपलब्ध होतील. हा प्रकल्प 36 बिलियन डॉलर म्हणजेच (अंदाजे 2 लाख 50 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक) आर्थिक नफा होईल, असाही अंदाज राज्य सरकारने व्यक्त केला आहे. मुंबईहून पुणे गाठण्यासाठी साडेतीन तासांचा अवधी लागतोच मात्र येत्या भविष्यात वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतूक व्यवस्था अधिक बिकट होईल. यामध्ये मग मुंबई-पुणे हायपरलूप ट्रेन (किंवा पॉड)ने केवळ 31 मिनिटांत हे अंतर गाठता येईल. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचा हा महत्वकांक्षी प्रकल्प असणार आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments