Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेत भारत विजयी

Webdunia
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018 (16:26 IST)
संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार समितीत भारताचा सामावेश झाला आहे. भारताने संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेच्या सदस्यत्वाच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला. आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील देशांमध्ये सर्वाधिक १८८ मतांनी या समितीवर भारताची निवड करण्यात आली.
 
१ जानेवारी २०१९ पासून तीन वर्षांसाठी भारताची या समितीवर निवड करण्यात आली आहे. गुप्त मतदानाने ही निवडणूक पार पडली. त्यात निवडून येण्यासाठी किमान ९७ मतांची आवश्यकता होती. संयुक्त राष्ट्राचे सदस्य असले्लया १९३ देशांनी मानवाधिकार समितीतील नव्या देशांच्या सदस्यात्वासाठी मतदान केले. यापैकी १८८ देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले.
 
दरम्यान, आशिया-पॅसिफिक गटात भारताशिवाय बहरिन, बांगलादेश, फिजी आणि फिलिपाइन्स या देशांनीही दावेदारी सांगितली होती. मात्र भारताचं पारडं आधीपासूनच जड होतं. यापूर्वी भारत २०११-१४ आणि २०१४-१७ असा दोन वेळा मानवाधिकार परिषदेचा सदस्य राहिला आहे.

संबंधित माहिती

मुंबईत इमारतीच्या 40 फूट खोल सेप्टिक टँकमध्ये पडून दोन कामगारांचा मृत्यू

वंदे भारत गाड्यांमध्ये अर्धा लिटर पाण्याच्या बाटल्या मिळणार

उद्धव ठाकरेंच्या 'अभद्र' वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं सडेतोड उत्तर

कोटक महिंद्रा बँकेवर RBI ची कारवाई, क्रेडिट कार्ड जारी करण्यास बंदी

75 फूट उंचीवरून महिला थेट ज्वालामुखीत पडली, मृत्यू

ब्रिटिश संसदेने रवांडा निर्वासन विधेयक मंजूर केले

मलेशियामध्ये दोन नौदलाचे हेलिकॉप्टरची जोरदार धडक सर्व 10 क्रू मेंबर्स ठार

IPL 2024: 56 चेंडूत शतक झळकावून रुतुराज गायकवाडने इतिहास रचला

LSG vs CSK : मार्कस स्टॉइनिसने IPL मधील 13 वर्षे जुना विक्रम मोडला

टेनिस स्टार नोव्हाक जोकोविचची वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून 5 व्यांदा निवड

पुढील लेख
Show comments