Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोण आहे Kacha Badam सिंगर Bhuban Badyakar, शेंगदाणे विकणाऱ्या रॉकस्टारची कहाणी जाणून घ्या

Webdunia
बुधवार, 2 फेब्रुवारी 2022 (14:02 IST)
'कच्चा बदाम' हे गाणे सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहे. यावर सर्वजण रिले काढत आहेत. आणि हे जाणून आश्चर्य वाटणार नाही की आत्तापर्यंत या गाण्यावर 3.5 लाख रील्स बनवल्या गेल्या आहेत. कारण प्रत्येक तिसरा व्हिडिओ यावर दिसत आहे. त्यातून शब्द कळत नसतील, पण पावले सगळे सारखेच चालतात. आता प्रश्न असा आहे की हे गाणं कुठून आलं? कोणत्या चित्रपटातील आहे आणि कोणी गायला आहे? तर माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की हे गाणे पश्चिम बंगालमधील आहे परंतु ते कोणत्याही चित्रपटातील नाही किंवा ते कोणत्याही मोठ्या गायकाने नव्हे तर एका शेंगदाणा विक्रेत्याने गायले आहे. गाण्याचे बोल बंगाली भाषेत आहेत, जे पुढीलप्रमाणे आहेत-
 
बादाम बादाम दादा कांचा बादाम
आमार काछे नाइतो बूबू वाजा बादाम
आमार काछे पाबे सुधु वाजा बादाम
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे गाणे भुबन बादायकरने गायले आहे. ते मूळचे पश्चिम बंगालमधील कुरलजुरी गावचे आहे. त्यांच्या वडिलांना तीन भाऊ आहेत आणि पोट भरण्यासाठी ते शेंगदाणे विकण्याचे काम करतात. सायकलवर शेंगदाण्यांनी भरलेली पिशवी लटकवून ते घरातून निघतात आणि 'कच्छा बदाम' गाणे म्हणत गावोगावी जातात. तेथे ते घरातील तुटलेल्या वस्तूंच्या बदल्यात शेंगदाणे विकतात. रोज 3-4 किलो विकून भुवनाला 200-250 रुपयेच मिळतात.
 
मीडियाशी संवाद साधताना भुबनने सांगितले की, त्याचे गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याचा व्यवसाय खूप वाढला आहे. भुबन म्हणाले की 'माझ्या गाण्याबद्दल लोकांना माहिती व्हावी एवढीच माझी इच्छा आहे. सरकारने मला मदत करावी आणि काही निधी द्यावा, जेणेकरून मी माझ्या कुटुंबासाठी काहीतरी करू शकेन. मला त्यांना चांगले जेवण आणि घालायला कपडे द्यायचे आहेत.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments