suvichar

मुंबई इंडियन्सचं आयपीएलमधलं आव्हान अखेर साखळीतच संपुष्टात

Webdunia
सोमवार, 21 मे 2018 (08:48 IST)

मुंबई इंडियन्सचं आयपीएलमधलं आव्हान अखेर साखळीतच संपुष्टात आलं  आहे. त्यामुळे रोहित शर्मासह   खेळाडूना मोठा धक्का बसला आहे.  दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून अकरा धावांनी मुंबई इंडियन्सला अखेरच्या साखळी सामन्यात  पराभव स्वीकारावा लागला   आहे.  या पराभवामुळंच मुंबईचं आयपीएलमधलं आव्हान संपुष्टात आले आहे.  दिल्लीनं मुंबईला विजयासाठी 175 धावांचं आव्हान दिलं होतं ,  दिल्लीने मुंबईचा ११ धावांनी पराभव करत स्पर्धेचा शेवट गोड केला आहे. दिल्लीचा संघ याआधीच आयपीएलमधून बाहेर गेला आहे. मुंबईने २०१३, २०१५ आणि २०१७ मध्ये आयपीएलचा चषक  जिंकला होता.  लमिछानेनं 36 धावांत तीन, तर मिश्रानं 19 धावांत तीन फलंदाजांना माघारी धाडलं. त्याआधी रिषभ पंत आणि विजय शंकर यांच्या चमकदार फलंदाजीनं दिल्लीला चार बाद 174 धावांची मजल मारून दिली होती. पंतनं 64 धावांची, तर विजय शंकरनं नाबाद 43 धावांची खेळी केली होती ,  मुंबईच्या दोन्ही सलामीविरांना फिरकीपटूंनी बाद केले. मुंबईचे १० पैकी ६ फलंदाजांना फिरकपटूंनी बाद केले त्यामुळे मुंबईचा पराभव झाला. सूर्यकुमार, ल्युईस, किशन, कृणाल आणि हार्दिक पांड्या, पोलार्ड ही आघाडीची फळी दिल्लीच्या फिरकीमुळे आउट झाली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या अध्यक्षा! प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाची घोषणा केली

LIVE: संजय राऊत यांना सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा; १५ दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा रद्द

नांदेडमध्ये १६ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली; ५ जणांविरुद्ध एफआयआर दाखल

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यवतमाळला मोठी भेट दिली, ५७० कोटींच्या जिल्हा वार्षिक योजनेला मंजुरी

सिक्कीममध्ये दोनदा भूकंपाचे धक्के बसले; लोकांमध्ये घबराट पसरली

पुढील लेख
Show comments