Marathi Biodata Maker

शेतकर्‍याने बांधले मोदींचे मंदिर, खर्च केले सव्वा लाख रुपये

Webdunia
गुरूवार, 26 डिसेंबर 2019 (11:39 IST)
तामिळनाडूमधील एका शेतकऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे एक मंदिर बांधले आहे. 50 वर्षीय शंकर त्रिची जिल्ह्याच्या इराकुडी गावातील रहिवासी आहे. त्याने या मंदिरासाठी एक लाख २० हजार रुपयांचा खर्च स्वत: केला आहे.
 
शंकर यांनी आपल्या शेतावर मंदिर बांधले असून रोज सकाळी पूजा करतात आणि मंत्र देखील वाचातत. मोदी हे देव असून भारताचा विकास करण्यासाठी त्यांचा जन्म झाला आहे, असं या शेतकऱ्याचं म्हणणं आहे.
 
भाजप कार्यकर्ता असणाऱ्या पी. शंकर यांनी मोदींवरील प्रेमापोटी आपण हे मंदिर बांधल्याचे म्हटलं आहे. हे मंदिर आता पंचक्रोषीमध्ये ‘नमो मंदिर’ नावाने लोकप्रिय झालं आहे. आजूबाजूच्या गावांमधून अनेकजण या मंदिरामध्ये असणाऱ्या मोदींच्या मुर्तीचे दर्शन घेण्यासाठी येऊ लागले आहेत. 
 
मोदींनी सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान व्हावं असं वाटतं असताना त्यांनी हे मंदिर बांधण्याचं ठरवलं. मोदींनी शेतकऱ्यांसाठी बरीच कामं केली आहे. प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेमुळे शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. यामुळे त्यांच्याबद्दल प्रेम आणि सन्मान व्यक्त करण्यासाठी मी मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. असं शंकर सांगतात. 
 
2014 पासूनच मंदिर बांधण्याची इच्छा होती परंतू काही कारणास्तव ते तेव्हा शक्य झशले नाही परंतू आता त्यांनी शेतामध्ये एक छोटे मंदिर बांधले. यात ठेवण्यात आलेली पीएम यांची मूर्ती 2 फीट ऊंच आहे. पांढरा कुर्ता आणि निळं जॅकेट परिधान केलेली ही मूर्ती आहे.  
 
तामिळनाडूची माजी मुख्यमंत्री जे जयललिता, सीएम पलानीसामी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे फोटो देखील मंदिराच्या भींतीवर लावण्यात आले आहे.
 
हे संपूर्ण मंदिर शंकर यांनी स्वखर्चाने बांधले आहे. हे मंदिर उभारण्यासाठी त्यांनी एक लाख 20 हजार रुपये खर्च केले आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

LIVE: मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला ३० मे पासून उपोषण करण्याचा अल्टिमेटम

CBSE बोर्डचा नवा नियम : आता इयत्ता ९वी-१०वी मध्ये तीन भाषा शिकणे अनिवार्य असणार, नियम १ जुलैपासून लागू

भाविकांनी भरलेल्या ट्रॉलीला ट्रकची धडक, सहा जणांचा मृत्यू

नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शुभम खैरनारने डॉक्टर असल्याचे भासवून कौन्सलिंगच्या नावावर विद्यार्थ्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली

नीट यूजी परीक्षा वाद छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

पुढील लेख
Show comments