Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तरुणासाठी 85 वर्षीय आजोबांनी बेड सोडला, तीन ‍दिवसांनी निधन

Nagpur news
Webdunia
बुधवार, 28 एप्रिल 2021 (13:48 IST)
कोरोनाची दुसरी लाट अत्यंत भयावह असून ऑक्सिजन, बेड आणि इंजेक्शन मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. अशात नागपुरातील 85 वर्षीय वृद्धाने त्यागेचं एक वेगळं उदाहरण जगासमोर ठेवलं. 
 
नागपूरमधील नारायण भाऊराव दाभाडकर असे या 85 वर्षांच्या यौद्धाचे नाव आहे. दाभाडकर यांना काही दिवसांपूर्वी कोरोना संसर्ग झाला होता. त्यांची ऑक्सिजन लेव्हल 60 पर्यंत पोहोचली होती. मुलगी आणि जावयाने त्यांना इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात दाखल केलं. खूप प्रयत्नानंतर त्यांना बेड मिळाला होता. त्याचवेळी एक महिला आपल्या 40 वर्षीय पतीसाठी बेड शोधत होती. मात्र बेडअभावी रुग्णालयाने त्यांना दाखल करण्यास असमर्थता दर्शवली. बेड मिळत नसल्याने ती महिला रडत असल्याचे दाभाडकर यांनी पाहिले होते. रडणाऱ्या महिलेला पाहून दाभाडकरांनी त्यांना आपला बेड देण्याचा निर्णय घेतला.
 
रुग्णालय प्रशासनाने दाभाडकर यांच्याकडून स्वइच्छेने बेड देत असल्याचे लिहून घेतले. त्यांनतर दाभाडकर यांना घरी आणण्यात आले. घरी तीन दिवसानंतरच त्यांचे निधन झाले. 
 
बेड स्वेच्छेने सोडत असल्याचं पत्र
“मी 85 वर्षांचा झालोय, आयुष्याचा भरभरुन उपभोग घेतला, जर त्या महिलेच्या पतीचे निधन झाले, तर तिची मुलं अनाथ होतील. त्यामुळे त्या व्यक्तीचे प्राण वाचवणे हे माझे कर्तव्य आहे. मी माझा बेड स्वेच्छेने दुसऱ्या रुग्णासाठी सोडत आहे”, असे पत्र त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिले.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रात एप्रिल फूल सरकार सुरू आहे, आदित्य ठाकरे म्हणाले

महाराष्ट्रात लवकरच ई-बाइक टॅक्सी सुरू होणार, राज्य सरकारने दिली मंजुरी

भारतातील या राज्यात एक जोरदार भूकंप झाला,लोक घराबाहेर पडले

वक्फ विधेयकावर गोंधळ सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरे यांच्या वर घणाघात टीका

महाराष्ट्रात एप्रिल फूल सरकार सुरू आहे, आदित्य ठाकरे म्हणाले

पुढील लेख