suvichar

जंतूनाशक फवारणी : कोरोना व्हायरसपासून बचाव होईल की ठरेल धोकादायक?

Webdunia
शुक्रवार, 22 मे 2020 (11:31 IST)
भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रस्त्यांवर जंतूनाशकांची फवारणी केली जात आहे. परंतू यामुळे मानवी शरीरावर विपरित परिणाम होत असून विषाणूला चाप बसत नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे.
 
कोविड-19 महामारी संदर्भात डब्ल्यूएचओने स्वच्छता आणि सतहला जिवाणूमुक्त करण्यासाठी गाइडलाइन जारी केली आहे. 
 
डब्ल्यूएचओने स्पष्ट केले आहे की बाजार, छोट्या गल्लया, झोपडपट्ट्यांमधील अस्वच्छता आणि हवेतील धूलिकणांमुळे जंतूनाशक फवारणीचा काहीही उपयोग होत नाहीये. ही फवारणी कोरोना विषाणूला रोखण्यासाठी परिणामकारक नसल्याचे संघटनेने म्हटले आहे. उलट या फवारणीमुळे गंभीर आजार होण्याचा धोका आहे.
 
दुष्परिणाम
धूळ आणि अस्वच्छतेमुळे जंतूनाशक निष्क्रीय होऊ शकतात. यामुळे शारीरिक आणि मानसिक दुखणी उद्भवू शकतात. हे रसायन डोळे आणि त्वचेसाठी धोकादायक ठरु शकते. यामुळे त्वचेची जळजळ, श्वास घेण्यास त्रास, डोळे जळजळ, आणि पोटाचे विकार अश्या समस्या उद्भवू शकतात. 
 
घरच्या आत जंतूनाशक वापरण्यावर देखील संघटनेने चेतावणी दिली आहे. जंतूनाशक वापरायचेच असल्यास याला कपड्याने भिजवून पुसायला हवे.
 
जगभरात तीन लाखाहून अधिक लोकांचा बळी घेणारा कोरोना व्हायरस सतह किंवा इतर कुठल्याही वस्तूवर आढळतो. तशी तर याबद्दल प्रमाणिक माहीत उपलब्ध नाही की कोरोना कोणत्या सतहवर किती काळ जिवंत राहू शकतो. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

पुढील ३ दिवस तीव्र उष्णतेची लाट, विदर्भात रेड अलर्ट

LIVE: पुणे शहरात मंगळवार, २६ मे, २०२६ पासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली

अवैध गाय वाहतूक: बकरीदच्या काळात गाय तस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्र परिवहन विभाग सज्ज

१ पद्मविभूषण, ३ पद्मभूषण आणि ११ पद्मश्री पुरस्कारा मिळाल्याने, २०२६ च्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र चमकला

भंडारा जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे १०० हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments