Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नेटवर्क नसले तरी वायफायने कॉल करता येणार !

Webdunia
शनिवार, 23 जून 2018 (13:15 IST)
मोबाईल नेटवर्क अचानक गायब झाल्यानंतर कॉल करण्याची मोठी अडचण होते. आता वायफाय आपली ही समस्या दूर करु करणार आहे. कारण, लवकरच वायफायच्या मदतीने मोबाईलला नेटवर्क नसतानाही फोन कॉल करता येणार आहे.
 
एका इंग्रजी वर्तमानपत्रानुसार, दूरसंचार खात्याने दूरसंचार सेवा पुरवठ्याबाबतच्या परवान्यात काही बदल केले आहेत. ज्यामुळे कंपनीला सेल्युलर सर्व्हिस आणि इंटरनेट टेलीफोनी सर्व्हिस या दोंन्हीसाठीही एकच मोबाईल नंबर द्यावा लागणार आहे.
 
ग्राहकांना इंटरनेट टेलीफोनीसाठीच्या वापरासाठी एक अॅप डाऊनलोड करावे लागेल. हे अॅप ग्राहकांना त्यांची टेलीकॉम कंपनीच उपलब्ध करून देईल. त्यामुळे तुमच्याकडे ज्या कंपनीचे सिमकार्ड असेल त्याच कंपनीचा टेलीफोनी मिळेल. सिमकार्डबरोबर लिंक असणारा नंबरच तुम्ही वापरु शकाल.
 
ग्राहक दुसऱ्या कंपनीचेही टेलीफोनी अॅप डाऊनलोड करू शकतात. त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबरसारखाच एक दहा अंकी नंबऱ मिळेल, ज्याचा कॉल करण्यासाठी तुम्ही वापर करु शकाल. खराब नेटवर्क आणि कॉल ड्रॉपचा फटका बसणाऱ्या ग्राहकांसाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ‘ट्राय’ने ही शिफारस केली होती.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments