Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Fact Check: महिलांनी पीरियड्स दरम्यान COVID वॅक्सीन घेऊ नये? जाणून घ्या सत्य

Webdunia
सोमवार, 26 एप्रिल 2021 (15:38 IST)
केंद्र सरकारने 1 मे पासून 18 वर्षाहून अधिक वयाच्या लोकांना लस देण्याची घोषणा केली आहे. 28 एप्रिलपासून वॅक्सीनेशनसाठी कोविन पोर्टल आणि आरोग्य सेतु अॅप यावर रजिस्ट्रेशन सुरु होत आहे. परंतू सोशल मीडियावर एक पोस्ट खूप व्हायरल होत आहे की ज्यात मुलींना काही ठराविक दिवस लसीकरण करु नये असा सल्ला दिला जात आहे. जाणून घ्या काय आहे व्हायरल पोस्ट-
 
व्हायरल पोस्टमध्ये म्हटलं जात आहे की महिलांनी मासिक पाळीच्या 5 दिवस आधी आणि 5 दिवस नंतर वॅक्सीन घेऊ नये. दावा आहे की पीरियड्स दरम्यान महिलांची इम्यूनिटी कमकुवत होते. तसंच वॅक्सीन लावल्यानंतरही इम्युनियक्ष कमी होते काही दिवसांनंतर प्रतिकारक शक्ती वाढते. अशात पीरियड्स दरम्यान वॅक्सीनेशन केल्याने धोका वाढू शकतो.
 
काय आहे सत्य- 
‘वेबदुनिया’ ने स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. हेमा जाजू यांच्याशी चर्चा केली तर त्यांनी म्हटलं की ‘ही समज चुकीची आहे, असे काहीही नाही. मुली आणि महिला कधीही लस घेऊ शकतात. मासिक पाळी आणि लसीकरण यांच्यात काहीही संबंध नाही.’
 
आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. सुषमा खंडेलवाल यांनी सांगितले की,’पीरियड्स दरम्यान लस लावण्यात कोणतीही अडचण नाही. ज्यांना अशक्तपणा जाणवतो, उलट्या होतात किंवा क्रॅम्प्स येतात त्यांनी टाळावा. ज्यांना पीरियड्स दरम्यान काही त्रास होत नाही त्यांनी लस घेण्यात हरकत नाही.’
 
भारत सरकारच्या प्रेस इंफॉर्मेशन ब्यूरो (PIB) च्या फॅक्ट चेक टीमने देखील या फेक मेसेजवर लोकांना सावध केलं आहे. PIB ने ट्विट करत सांगितले की ‘सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फेक पोस्टमध्ये दावा केला जात आहे की महिलांनी आपल्या पीरियड्सच्या 5 दिवसापूर्वी आणि 5 दिवसानंतर वॅक्सीन घेऊ नये.’
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

गृहस्थ जीवनासाठी महादेवाचे 15 संदेश

श्री तुळजा भवानी मातेला का दिली जाते पलंगावर निद्रा

Chandra Dosh Mukti शरद पौर्णिमेला हे करा धनलाभ मिळवा

एखादा कीटक चावला असेल तर सावधान! कीटक चावल्यास काय करावे

राग केल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो का?जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

मुंबईहून लंडनला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये इमर्जन्सी अलर्ट, विमान हवेत फिरते

पंखे वाले बाबा कोण ? 'लड्डू मुट्या' का होत आहे व्हायल ?

रेल्वे बुकिंग व्यवस्थेत मोठा बदल, आता किती दिवसांपूर्वी तिकीट बुक करता येईल जाणून घ्या

सरफराज-तालिब एनकाउंटर: बहराइच हिंसाचार प्रकरणातील आरोपी नेपाळला पळून जाण्याच्या प्रयत्नात होते

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024: मनोज जरांगे पाटील फॅक्टर किती परिणामकारक ठरणार?

पुढील लेख
Show comments