Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रायबरेलीमधून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली

Webdunia
शनिवार, 4 मे 2024 (00:02 IST)
रायबरेलीमधून उमेदवारी दाखल केल्यानंतर काँग्रेस नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी लिहिले की, 'रायबरेली मधून उमेदवारी हा माझ्यासाठी भावनिक क्षण होता. माझ्या आईने कुटुंबाची कर्मभूमी माझ्यावर विश्वासाने सौपवली असून मला सेवा करण्याची संधी दिली आहे. अमेठी आणि रायबरेली माझ्यासाठी काही वेगळे नाही. दोघेही माझे कुटुंब आहे. अन्यायाविरुद्ध सुरु असलेल्या न्यायाच्या लढाईत मी माझ्या प्रियजनांचे आशीर्वाद मागतो. तुम्ही माझ्या पाठीशी आहेत असा मला विश्वास आहे. 40 वर्षांपासून मतदारसंघाची सेवा करणाऱ्या किशोरीलालजी अमेठीतून पक्षाचे प्रतिनिधित्व करणार आहे याचा मला आनंद आहे.    

राहुल गांधी यांनी दुपारी 2 :15 वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल केला. त्यांच्या सोबत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, प्रियांका गांधी, सोनिया गांधी, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवन्त रेड्डी आणि राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत उपस्थित होते.  

राहुल गांधी आज सकाळीच एका विशेष विमानाने फुरसातगंजला पोहोचले होते . तेथून अमेठीमार्गे रायबरेलीला आले. रायबरेली येथील केंद्रीय काँग्रेस कार्यालयात पूजा केल्यानंतर राहुल यांची नामांकन मिरवणूक निघाली. या मिरवणुकीत मोठा जनसमुदाय सहभागी झाला होता. 
 
रायबरेली मतदार संघातून राहुल यांना भाजपचे दिनेश प्रताप दुसऱ्यांदा गांधी कुटुंबाला लढत देणार आहे. दिनेश प्रताप यांनी 2019 मध्ये सोनिया गांधी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. पण त्यांचा पराभव झाला. 
 
 Edited By- Priya Dixit 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मेंढपाळ कुटुंबात जन्म ते ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन, कोण आहेत लक्ष्मण हाके?

MH-CET विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांची माहिती उत्तरपत्रिका देण्याची आदित्य ठाकरे यांची मागणी

CSIR-UGC-NET: NTA ने CSIR-UGC-NET परीक्षा पुढे ढकलली

माझ्या डोळ्यांसमोर भावाचा तडफडून मृत्यू झाला', तामिळनाडूत विषारी दारुचे 47 बळी-ग्राउंड रिपोर्ट

सुजय विखेंनी EVM, VVPAT च्या पडताळणीची मागणी का केली? ही प्रक्रिया काय असते?

सर्व पहा

नवीन

अरविंद केजरीवालांची सुटका लांबणीवर, न्यायालयाने जामिनाबद्दलचा निर्णय ठेवला राखून

वर्षा गायकवाड यांनी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली

सोलापुरात फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, सुदैवाने जन हानी नाही

NEET परीक्षेतील हेराफेरी विरोधात नागपुरात काँग्रेसचे चिखलफेक आंदोलन

'या' आजारावर गर्भातच उपचार केल्याने हजारो बाळांचा जीव वाचू शकतो

पुढील लेख
Show comments