Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रायबरेलीमधून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली

Webdunia
शनिवार, 4 मे 2024 (00:02 IST)
रायबरेलीमधून उमेदवारी दाखल केल्यानंतर काँग्रेस नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी लिहिले की, 'रायबरेली मधून उमेदवारी हा माझ्यासाठी भावनिक क्षण होता. माझ्या आईने कुटुंबाची कर्मभूमी माझ्यावर विश्वासाने सौपवली असून मला सेवा करण्याची संधी दिली आहे. अमेठी आणि रायबरेली माझ्यासाठी काही वेगळे नाही. दोघेही माझे कुटुंब आहे. अन्यायाविरुद्ध सुरु असलेल्या न्यायाच्या लढाईत मी माझ्या प्रियजनांचे आशीर्वाद मागतो. तुम्ही माझ्या पाठीशी आहेत असा मला विश्वास आहे. 40 वर्षांपासून मतदारसंघाची सेवा करणाऱ्या किशोरीलालजी अमेठीतून पक्षाचे प्रतिनिधित्व करणार आहे याचा मला आनंद आहे.    

राहुल गांधी यांनी दुपारी 2 :15 वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल केला. त्यांच्या सोबत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, प्रियांका गांधी, सोनिया गांधी, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवन्त रेड्डी आणि राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत उपस्थित होते.  

राहुल गांधी आज सकाळीच एका विशेष विमानाने फुरसातगंजला पोहोचले होते . तेथून अमेठीमार्गे रायबरेलीला आले. रायबरेली येथील केंद्रीय काँग्रेस कार्यालयात पूजा केल्यानंतर राहुल यांची नामांकन मिरवणूक निघाली. या मिरवणुकीत मोठा जनसमुदाय सहभागी झाला होता. 
 
रायबरेली मतदार संघातून राहुल यांना भाजपचे दिनेश प्रताप दुसऱ्यांदा गांधी कुटुंबाला लढत देणार आहे. दिनेश प्रताप यांनी 2019 मध्ये सोनिया गांधी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. पण त्यांचा पराभव झाला. 
 
 Edited By- Priya Dixit 
 
 
 

संबंधित माहिती

SCO vs AUS :ऑस्ट्रेलिया आणि स्कॉटलंड यांच्यातील T20 विश्वचषक सामना रविवारी, प्लेइंग 11 जाणून घ्या

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचा खर्गे यांना सल्ला म्हणाले-

मुंबईत बायकोच्या त्रासाला कंटाळून पोलीस हवालदाराची आत्महत्या

Porsche Car Crash: मुंबई उच्च न्यायालयाचा पुणे पोर्श कार अपघातातील आरोपींना सोडण्यास नकार

नागपूर स्फोटकांच्या कारखान्यात मृतांची संख्या आठ वर पोहोचली

INDIA vs CANADA : ओल्या मैदानामुळे भारत-कॅनडा सामना रद्द

18 जून रोजी वाराणसीमध्ये पीएम मोदी शेतकऱ्यांसाठी 20 हजार कोटी रुपये जारी करणार

नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांनी चकमकीत आठ नक्षलवाद्यांना ठार मारले,एक जवान शहीद, दोन जवान जखमी

लघवीचा रंग तुमच्या आरोग्याबद्दल काय सांगतो? त्याबद्दल चिंता कधी करायला हवी? वाचा

कामाचं नाटक करत, माऊस खेळवत राहाणाऱ्यांची बँकेने केली हकालपट्टी

पुढील लेख
Show comments