Dharma Sangrah

प्रकाश आंबेडकरांचा शाहू महाराजांना पाठिंबा

Webdunia
रविवार, 24 मार्च 2024 (10:22 IST)
कोल्हापूर :प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये शाहू छत्रपती यांना पाठिंबा जाहीर केला आहे. शाहू महाराजांना काँग्रेसने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे.महाविकास आघाडीमध्ये अद्याप जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. केवळ काँग्रेसने आपल्या सात उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली आहे.
 
कोल्हापूरमध्ये काँग्रेसने शाहू छत्रपती यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
महाविकास आघाडीची वंचित बहुजन आघाडीसोबत बोलणी सुरूच आहे. त्यापूर्वीच आता प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापूरमध्ये शाहू छत्रपतींना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. शनिवारी दुपारी ४ वाजता आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आंबेडकर बोलत होते.
 
प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, काँग्रेसने ज्या सात जागा जाहीर केल्या आहेत, त्या त्यांनी आम्हाला सांगाव्यात. आम्ही त्यांना इतर जागांवर पाठिंबा देणार नाही. येत्या २६ तारखेला आम्ही आमची भूमिका जाहीर करणार आहोत. भाजपला सत्तेतून खाली खेचणे, हेच आमचे लक्ष्य आहे.
 
शाहू महाराजांनी मानले आभार
‘वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आपल्याला पाठिंबा जाहीर केल्याचे मला आत्ताच कळालं. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज यांचे संबंध हे किती जिव्हाळ्याचे होते हे सगळ्यांनाच माहिती आहे. हा दृष्टिकोन ठेवूनच त्यांनी मला हा पाठिंबा दिला असेल असं मला वाटतं.’ अशा शब्दांत शाहू छत्रपतींनी आंबेडकरांचे आभार मानले.

Edited By -Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

ठाण्यातील ज्येष्ठ नागरिकाला व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे 1.06 कोटी रुपयांची फसवणूक

LIVE: पुण्यातील हवा विषारी झाली, एक्यूआय 242 वर पोहोचला

पुण्यातील हवा विषारी झाली, एक्यूआय 242 वर पोहोचला

इंडिगो संकटावर भारतीय रेल्वेची मोठी घोषणा, अडकलेल्या प्रवाशांसाठी 84 विशेष गाड्या चालवणार

नागरी उड्डाण मंत्रालयाने प्रभावित मार्गांसाठी कमाल भाडे मर्यादा निश्चित केली

पुढील लेख
Show comments