Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उदयनराजेंचा पराभव करण्याचा भाजपाचाच डाव, मराठा क्रांती ठोक मोर्चाचा खळबळजनक आरोप

Webdunia
मुंबई: सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत उदयनराजे यांचा पराभव भाजपाच करण्याची शक्यता आहे, असा खळबळजनक आरोप मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक संजय सावंत यांनी केला. जर या पोटनिवडणुकीत उदयनराजे यांचा पराभव झाला तर राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण होईल. या सर्व घटनेला भाजप जबाबदार राहिल, असा सज्जड इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
 
आरक्षण मिळावे. या मागणीसाठी मराठा समाजाचे लाखांचे मोर्चा निघाले. त्या मोर्चा दरम्यान ४२ जण हुतात्मा झाले, तर हजारो आंदोलनकर्त्यांवर गुन्हे देखील दाखल झाले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या बाजूने सरकार असून मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीला न्याय देऊ, असे त्यांनी त्यावेळी जाहीर केले होते. मात्र त्यापैकी कोणत्याही आश्वासनाची पूर्तता आजवर झाली नाही. त्यामुळे या सरकारचा आम्ही निषेध करित आहोत. तसेच या सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. आता आम्ही आगामी विधानसभा निवडणुकीत या भाजप सरकारला त्यांची जागा दाखविली जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
 
ज्या मराठा समाजाची भाजप सरकारने फसवणूक केली आहे. त्याच भाजपात उदयनराजे हे गेले असून भाजपकडून उदयनराजे यांची पोटनिवडणुकीत फसवणूक होण्याची शक्यता आहे,” असे सावंत म्हणाले. “उदयनराजे यांना विजयी करण्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी. अशी मागणी त्यांनी यावेळी केली. जर या निवडणुकीत उदयनराजे यांचा पराभव झाल्यास राज्यभरात गंभीर परिस्थिती निर्माण होईल आणि सर्वाना भाजप जबाबदार राहिल,” असल्याचे त्यांनी सांगितले.
 
लोकसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उदयनराजे हे निवडून आले. या निवडणुकीला काही दिवस होत नाही, तोच उदयनराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे आता २१ तारखेला साताऱ्यात पोटनिवडणूक होणार आहे.

संबंधित माहिती

बेजवाबदारपणा, डॉक्टरांनी बोटाच्या जागी जिभेची केली सर्जरी

JEE Advanced 2024 परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, या लिंकवरून डाउनलोड करा

नवीन पिढीला संधी देत नाहीये पीएम नरेंद्र मोदी, तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यासाठी आहे उत्सुक- उद्धव ठाकरे

ऊत्तर प्रदेशमध्ये उद्योगपतीची हत्या, मित्राने केली आत्महत्या

पीएम नरेंद्र मोदींनी सांगितले, का दुखावले गेले अखिलेश यादव

घाटकोपर होर्डिंग प्रकरण : मलब्यामधून खराब अवस्थेत निघाल्या 73 गाड्या, 4 दिवसानंतर रेस्क्यू ऑपरेशन संपले

4 जूनला निवृत्त होतील PM, उद्धव ठाकरेंनी मोदींच्या बॅक टू बॅक रॅलीवर उठवले प्रश्न

नाल्यात सापडला 4 वर्षाच्या मुलाचा मृतदेह, संतप्त लोकांनी शाळा पेटवली

पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडियाच्या विमानाला अपघात, 180 प्रवासी सुखरूप बचावले

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये होईल पाऊस, IMD ने घोषित केला अलर्ट

पुढील लेख
Show comments