Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

१६ जूनचे आंदोलन पुढे ढकलावे, संभाजीराजेंना आवाहन

Webdunia
मंगळवार, 8 जून 2021 (08:06 IST)
मराठा आरक्षणासंदर्भात राज्यातील सर्व संघटना व नेत्यांनी एकत्र येणे आवश्यक आहे. त्या आण्यासाठी मी पुढाकार घेतो आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी राज्यातील संघटनेच्या एकत्रित बैठकीला यावे अशी मी विनंती करणार आहे. तर दुसरी विनंती त्यांनी आंदोलन पुढे ढकलावे ही करणार असल्याचे भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. यावेळी ते म्हणाले की, मी आज किंवा उद्या संभाजी महाराजांशी बोलणार आहे. समनन्वयाची माझी भूमिका आहे. विनायक मेटे, संभाजी महाराज यांना देखील एकत्रित आणायचा माझा प्रयत्न आहे. राज्यात २३ संघटना काम करत आहेत. मग भूमिका वेगळी का असा प्रश्न उपस्थितीत करत त्यांनी सगळी ताकद एकत्रित आण्यासासाठी माझा प्रयत्न असेल. सगळे एकत्र येऊन आठवड्या भरात बैठक घेऊ असेही त्यांनी यावेळी सांगितले.
 
मराठा आरक्षणाच्या मुद्दावर नाशिक येथे आयोजित बैठकीप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळे ते म्हणाले की समाज बांधवांच्या भावना जाणून घेण्यासाठी बैठका घेतो आहे. राज्यभरातील समाजबांधवांना बोलावण्यात आले होते.आंदोलनाच्या भविष्यातील रणनीती बाबत चर्चा केली. लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. सगळ्या संघटनेच्या नेत्यांनी एकत्र यावे असे मी आवाहन केले होते. लोणीला याबाबत बैठक झाली. सरकार समाजात फूट पाडून स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत आहे. समाजातील आमदार खासदारांनी एकत्र आले पाहिजे ही आमची भूमिका. पहिले सगळ्या संघटनांना एकत्र आणणार मग आमदार खासदारांना एकत्र आणणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments