Dharma Sangrah

मुख्यमंत्री शिंदे लबाड नाही ; मनोज जरांगेंना संभाजी भिडेंनी काय सांगितलं?

Webdunia
बुधवार, 13 सप्टेंबर 2023 (08:21 IST)
जालन्यातील अंतरवाली गावात गेल्या १५ दिवसांपासून मराठ्यांना आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे हे उपोषणाला बसले आहेत. जोपर्यंत मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही, तोपर्यंत तसूभरही मागे हटणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. दुसरीकडे सरकारकडून जरांगे यांची मनधरणी सुरू आहे. आज राज्य सरकारचं एक शिष्टमंडळ जरांगे यांची भेट घेण्यासाठी जालन्यात दाखल झालं.
 
या शिष्टमंडळात मंत्री संदीपान भुमरे आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यासह संभाजी भिडे देखील आहेत. यावेळी संभाजी भिडे यांनी आम्ही मराठा आरक्षणाचा समस्या संपेपर्यंत तुमच्यासोबत आहे, तुम्ही मागे वळून पाहायचं नाही. जसे पाहिजे तसे मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा दिला.
 
राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लबाड नाहीत. देवेंद्र फडणवीसांच्या अंगी लुच्चेपणा नाही, उपमुख्यमंत्री अजित पवार जरी राष्ट्रवादीचे असतील, तरी कायदेशीर माणूस आहेत, माझं असं मत आहे की, तुम्ही उपोषण थांबवावं, अशी विनंती संभाजी भिडे यांनी मनोज जरांगे पाटील यांना केली आहे. त्याचबरोबर राजकारणी जो शब्द देतील, तो शब्द पाळून घ्याचं काम माझं आहे, मराठ्यांना आरक्षण नक्कीच मिळेल, असा विश्वासही मनोज जरांगे पाटील यांना दिला. दरम्यान, संभाजी भिडे यांच्या विनंतीनंतर मनोज जरांगे उपोषण मागे घेण्याबाबत नेमकी काय भूमिका घेणार? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

मुंबई: १६ व्या मजल्यावरून पडून वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू

LIVE: माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिला

अंबरनाथ-बदलापूरला मेट्रो मिळणार, पाणीटंचाईवर कायमचा उपाय; मुख्यमंत्री फडणवीसांनी मोठ्या घोषणा केल्या

मुंबई आणि नागपूर न्यायालयांमध्ये बॉम्बच्या बनावट धमकीमुळे घबराट पसरली, तासभर कामकाज ठप्प

सौरव गांगुलीने ५० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला; मेस्सीच्या कार्यक्रमाशी संबंधित प्रकरण

पुढील लेख
Show comments