Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मराठा आंदोलनाला हिंसक वळण, मनोज जरांगे आज पासून पिणार पाणी

Webdunia
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2023 (12:39 IST)
काही ठिकाणी मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. सोमवारी आंदोलकांनी तीन आमदारांची घरे आणि कार्यालये पेटवून दिली. नगर परिषदेच्या इमारतीलाही लक्ष्य करण्यात आले. हिंसाचाराच्या सर्वाधिक घटना बीड जिल्ह्यात घडल्या आहेत. बीडमध्येही प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. बीडमध्ये काही ठिकाणी आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. बीडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यालयाला आग लावली. राष्ट्रवादीच्या दोन आमदारांची घरेही जाळण्यात आली. 
 
आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात तीव्र आंदोलन होत आहे. आरक्षणाच्या मागणीला आता वेगळे वळण लागले आहे. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण आंदोलन केले आहे. त्यांनी अन्न पाणी सोडले आहे. सोमवारी त्यांनी मराठा बांधवांनी केलेल्या विनंतीमुळे पाणी प्यायले होते. आता पुन्हा त्यांना पाणी पिण्याची विनंती केली असून आज पासून ते पाणी पिणार आहे.  मनोज जरांगे यांनी या घटनांना आपला पाठिंबा नसल्याचं जाहीर केलं. हिंसेत सत्ताधारी कुणाचा हात आहे का, अशी शंका जरांगेंनी व्यक्त केली. कुणीही हिंसा करू नये, अन्यथा मला वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असं जरांगेंनी सांगितलं.

राज्यभरात मराठा आरक्षणासाठी आक्रमक होऊ नका, जाळपोळ बंद करा अन्यथा मला नाईलाज काही वेगळा निर्णय घ्यावा लागेल. मनोज जरांगे पाटीलांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. त्यांची प्रकृती ढासळल्याने आंदोलनकारी आक्रमक झाले आणि त्यांनी निर्दशने केली. या मुळे मनोज जरांगे पाटीलांनी आज पासून पाणी पिण्याचा निर्णय घेतला. 
 
 Edited by - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

आरोपी 28 वर्षे पोलिसांना चकवा देत होता, पोलिसांनी ताब्यात घेतले

आईला भेटण्यासाठी मुलगा थेट लंडनहून कार चालवत मुंबईत पोहोचला

पुण्यात झिका व्हायरसचे दोन रुग्ण आढळले

विधानसभा निवडणुकीपूर्वी तुतारी निवडणूक चिन्ह रद्द करण्याची शरद पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी

आंदोलकांनी केनियाच्या संसदेला आग लावली,भारताने आपल्या नागरिकांसाठी एक ॲडव्हायजरी जारी केली

सर्व पहा

नवीन

ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी, मोदी-राहुल गांधींनी सोबत जाऊन केलं अभिनंदन

अरविंद केजरीवाल यांना सीबीआयकडून अटक

इराणमध्ये नवीन राष्ट्राध्यक्षांच्या निवडीनंतर भारताबरोबरच्या संबंधांवर काय परिणाम होणार?

मुंबईतल्या कॉलेजमधील हिजाब बंदीच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास हायकोर्टाचा नकार

पुणे पोर्श कार अपघात आरोपीला जामीन मिळाल्यामुळे मृतक मुलीच्या आईला अश्रू अनावर

पुढील लेख
Show comments