Marathi Biodata Maker

चालू महिन्यात बँका तब्बल 10 दिवसांपेक्षा जास्त दिवस बंद राहणार

Webdunia
शनिवार, 3 ऑगस्ट 2019 (09:31 IST)
ऑगस्ट महिन्यात बँका तब्बल 10 दिवसांपेक्षा जास्त दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात बँकांची कामे रखडणार आहेत. नुकतंच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे.
 
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या यादीनुसार, ऑगस्ट महिन्यात देशातील बँका तब्बल 10 दिवस बंद राहणार आहेत. यात 12 ऑगस्ट – बकरी ईद, 15 ऑगस्ट -स्वातंत्र्य दिन या दोन दिवस देशातील सर्वच बँकांना अधिकृतरित्या सुट्टी आहे. त्याशिवाय ऑगस्ट महिन्यात 4, 11,18 आणि 25 या दिवशी रविवार आहे. या चारही दिवशी नेहमीप्रमाणे बँकांना सुट्टी असल्याने बँका बंद राहतील. या व्यतिरिक्त 10 आणि 24 ऑगस्टला दुसरा आणि चौथा शनिवार आहे. त्यामुळे या दोन्ही दिवशी बँका बंद राहणार आहे. यानुसार 8 दिवस देशातील सर्वच बँकांना सुट्टी असणार आहे.
 
याशिवाय 17 ऑगस्टला पारसी नूतनवर्ष असल्याने मुंबईत बँकेतील काम बंद राहिल. तसेच मंगळवारी 20 ऑगस्टला श्री श्री माधव देव तिथी असल्याने आसाममध्ये बँका बंद राहतील. तर दुसरीकडे उद्या 3 ऑगस्टला हरियाली तीज हा सण साजरा होणार आहे. हा सण प्रामुख्याने पंजाब, हरियाणा, चंदीगढ या ठिकाणी साजरा करण्यात येतो. त्यामुळे या राज्यातील बँका बंद राहणार आहेत.
 
तसेच दुसरीकडे 23 ऑगस्टला श्रीकृष्ण जयंती असल्याने राज्यात अनेक ठिकाणी बँका बंद राहणार आहे. त्याशिवाय 31 ऑगस्टला गुरु ग्रंथ साहिबा जी यांचा प्रकाश उत्सव आहे. हा उत्सव पंजाब आणि हरियाणा या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे या राज्यात 31 ऑगस्टला बँका बंद राहणार आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: पुणे शहरात मंगळवार, २६ मे, २०२६ पासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली

अवैध गाय वाहतूक: बकरीदच्या काळात गाय तस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्र परिवहन विभाग सज्ज

१ पद्मविभूषण, ३ पद्मभूषण आणि ११ पद्मश्री पुरस्कारा मिळाल्याने, २०२६ च्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र चमकला

भंडारा जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे १०० हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू

पुण्यात उद्यापासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू होणार!

पुढील लेख
Show comments