Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हे अतिशय तुटपुंजे अनुदान जाहीर केले, तीन हजार रुपये हमीभाव द्या

Webdunia
मंगळवार, 14 मार्च 2023 (09:38 IST)
नाशिक: कांद्याला राज्य सरकारने तीनशे रुपये प्रतिक्विंटल हे अतिशय तुटपुंजे अनुदान जाहीर केले असून यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. सरकारने अनुदानाची रक्कम वाढवून द्यावी आणि कांद्याला प्रति क्विंटल तीन हजार रुपये हमीभाव जाहीर करावा यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी मागणी केली आहे. यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
कांद्याला उत्पादन खर्च २००० ते २२०० रुपये प्रति क्विंटल इतका येत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना विधिमंडळात कांद्याला प्रतिक्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान देणार असल्याचे जाहीर केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्यामुळे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेसह अनेक शेतकरी संघटनांनी व विरोधी पक्षांनी कांद्याला अनुदान तसेच हमीभाव मिळावा यासाठी राज्यभर आंदोलने केले होते. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटल हमीभाव तसेच कवडीमोल दराने विकल्या गेलेल्या कांद्याला प्रति क्विंटल पंधराशे रुपये अनुदान मिळावे यासाठी जोरदार पाठपुरावा करण्यात आला होता असेही त्यांनी सांगितले.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

Potato Price: बटाट्यामुळे बिघडणार घराचे बजेट, महाग होण्याची शक्यता

नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांच्यावर ईव्हीएमला हार घातल्या प्रकरणी गुन्हा दाखल

263 कोटी टीडीएस घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने आणखी एक अटक केली

अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट,आप'चा भाजपवर मोठा आरोप

IPL 2024: कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार,हेड आणि नरेन यांच्यात रोमांचक लढत

Russia-Ukraine War: रशियाने युक्रेनवर दोन क्षेपणास्त्रे डागली, 10 जणांचा मृत्यू

मान्सून 9 ते 16 जूनदरम्यान महाराष्ट्रात येण्याची शक्यता

नॅशनल आयकॉन सचिन तेंडुलकरने मुलगा अर्जुनसोबत बजावला मतदानाचा हक्क

Lok Sabha Election: आदित्य ठाकरेंचा मोठा दावा, म्हणाले- 'मतदान जाणूनबुजून कमी करवले जात आहे

Lok Sabha Election 2024: राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात दुपारी 1 वाजे पर्यंत 27.78 टक्के मतदान

पुढील लेख
Show comments