Dharma Sangrah

कांदा पेटला, होणार अजून महाग, शेतकरी वर्गाने थांबवले लिलाव

Webdunia
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019 (10:33 IST)
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी आणणल्याने बाजारपेठेत कांद्याचे दर पडले आहे. याचे पडसाद कांद्याची मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगावमध्ये सोमवारी उमटले. कांद्याचे भाव घसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी लासलगावमध्ये लिलाव बंद पाडला. तसेच निफाडमध्ये शेतकऱ्यांनी रास्ता रोको सुरू केला आहे. विशेष म्हणजे लासल गाव सोबत, जिल्ह्यातील इतर बाजारपेठेत कांदा विक्री करणार नाही असा पवित्रा घेतला आहे. शेतकर्यांसोबत, या निर्णयाला व्यापारी वर्गाने सुद्धा तीव्र विरोध केला आहे.
 
दरम्यान संतप्त शेतकऱ्यांनी जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी एकत्र येत रास्ता रोको केला तर बाजार पेठेत विक्रीस आणलेला कांदा शेतकरी पुन्हा परत घेवून गेले आहे. जो पर्यंत निर्यात बंदी व इतर जाचक अटी सरकार काढणार नाही, व शेतकरी हिताचे निर्णय घेणार नाही तो पर्यंत बाजारात कांदा विक्री करणार नाही असा निर्धार शेतकरी वर्गाने घेतला असून, विशेष म्हणजे कोणतीही संघटना किंवा राजकीय पक्ष मागे उभा नसतांना हे तीव्र आंदोलन करण्यात आले आहे.
 
देशातील कांद्याच्या वाढत्या दराना नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय रविवारी जारी केला. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने यासंदर्भात पत्रकही जारी केले होते. कांद्याच्या निर्यात बंदीचा निर्णय तात्काळ लागू केला असल्याचे वाणिज्य मंत्रालयाने म्हटले होते. त्यानंतर या निर्णयाचा फटका शेतकऱ्यांना बसणार असल्याचे बोलले जात होते. त्यांचे परिणाम सोमवारी दिसून आले आहेत.
 
कांद्याचे भाव घसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी लासलगावमध्ये लिलाव बंद पाडला. तसेच निफाडमध्ये शेतकऱ्यांनी रास्ता रोको सुरू केला आहे.देशातील कांद्याच्या वाढत्या दराना लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय रविवारी जारी केला. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने यासंदर्भात पत्रक जारी केले होते. कांद्याच्या निर्यात बंदीचा निर्णय तात्काळ लागू केला असल्याचे वाणिज्य मंत्रालयाने म्हटले होते. त्यानंतर या निर्णयाचा फटका शेतकऱ्यांना असल्याचे बोलले जात होते. त्यांचे परिणाम सोमवारीच दिसून आले आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: पुणे शहरात मंगळवार, २६ मे, २०२६ पासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली

अवैध गाय वाहतूक: बकरीदच्या काळात गाय तस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्र परिवहन विभाग सज्ज

१ पद्मविभूषण, ३ पद्मभूषण आणि ११ पद्मश्री पुरस्कारा मिळाल्याने, २०२६ च्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र चमकला

भंडारा जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे १०० हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू

पुण्यात उद्यापासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू होणार!

पुढील लेख
Show comments