Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कांद्याचे भाव हे चाळीशी पार गेले

Webdunia
शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021 (07:55 IST)
कांदा उत्पादकांना चांगले दिवस येणार आहेत. तर गृहिणी आणि सर्वसामान्य नागरिकांचं बजेट चांगलंच कोलमडण्याची शक्यता आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात कांद्याचे भाव हे चाळीशी पार गेले आहेत.
 
नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट मध्ये कांद्याचे दर 40 ते 42 रुपयांपर्यंत पोहोचलेत. मागील वर्षी झालेल्या अवकाळी पावसाचा परिणाम कांदा उत्पादनावर झाला आहे. कांद्याचे उत्पादन कमी झाल्याने पहिल्यांदाच फेब्रुवारी महिन्यात सामान्य नागरिकांना कांदा चढ्या दरात खरेदी करावा लागत आहेत.
 
फेब्रुवारी अखेर पर्यंत हे दर वाढलेलेच राहणार असून नवीन उत्पादन यायला मार्च ते एप्रिल महिन्यापर्यंत वाट पहावी लागणार आहे. त्यामुळे पुढील महिने चढ्या दरानेच कांदा खरेदी करावा लागणार आहे.
 
सध्या बाजारपेठेत नगर,पुणे आणि नाशिक मधून कांदा येत असून कांद्याचे भाव वाढल्याने गुजरातधून पांढरा कांदा देखील बाजारात येत आहे. या कांद्याला 20 ते 22 रुपये किलो भाव मिळत आहे. हा कांदा स्वस्त असला तरी त्याला उठाव नसल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे लाल कांद्याची मागणी वाढली असल्यानं तो चढ्या दरानं विकला जात आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ramayan : हनुमानजी आपली शक्ती का विसरले?

Kamada Ekadashi 2025: ८ एप्रिल रोजी कामदा एकादशी, तिथी मुहूर्त आणि व्रतकथा

आंघोळीच्या पाण्यात या 4 गोष्टी मिसळा, भरपूर पैसा मिळेल, प्रगती होईल !

उन्हाळ्यात दररोज एक कच्चा कांदा खा, उष्माघातापासून बचाव होईल, इतरही अनेक फायदे

गुलकंद करंजी रेसिपी

सर्व पहा

नवीन

MI vs RCB: विराट कोहली टी-20 क्रिकेटमध्ये 13 हजार धावा पूर्ण करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला

LIVE: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत 3 'निर्भया' सायबर लॅबचे उद्घाटन केले

आरोग्य विभागाने पहिला अहवाल पोलिसांना सादर केला,दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची चूक असल्याचे म्हटले

सुप्रिया सुळे तनिषाच्या कुटुंबाला भेटणार,या प्रकरणात दिली प्रतिक्रिया

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आणखी एका स्वप्नातील प्रकल्पाचे काम थांबवण्याचे आदेश

पुढील लेख
Show comments