Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कांद्याचा पुन्हा वांदा, व्यापा-यांचा बेमुदत संप

Webdunia
गुरूवार, 21 सप्टेंबर 2023 (07:48 IST)
नाशिकमध्ये कांदा प्रश्न पुन्हा पेटला असून कांदा उत्पादक शेतक-यांनंतर आता कांदा व्यापारी वर्गाने बेमुदत संपाची हाक दिली आहे. कांदा व्यापा-यांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे आजपासून कांदा व्यापा-यांनी बेमुदत बंदची हाक दिली. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्व १५ बाजार समिती व उपबाजार समितीत कडकडीत बंद पाळण्यात आला.
 
नाशिकमध्ये गेल्या काही महिन्यांत सातत्याने कांदा उत्पादक शेतक-यांची अनेक आंदोलने पाहायला मिळाली. सुरुवातीला केंद्राने निर्यात शुल्क वाढविल्यामुळे शेतकरी संतप्त झाले होते. त्यानंतर केंद्राने नाफेडकडून खरेदी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यानंतरही शेतक-यांमध्ये नाराजी होती. अनेक दिवस हे आंदोलन सुरू होते. आता कुठे कांदा लिलाव सुरू झाला होता, तोच आता कांदा व्यापा-यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत तोडगा निघू न शकल्याने आजपासून कांदा लिलाव बंद ठेवण्यात आला. ही बैठक जिल्हाधिका-यांसोबत झाली. यावेळी तोडगा निघू शकला नाही. मुळात कांद्याचे निर्यातमूल्य वाढविल्याने व्यापा-यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे कांदा व्यापा-यांनी बेमुदत बंदची हाक दिली. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्व १५ बाजार समिती व उपबाजार समितीत कडकडीत बंद ठेवण्यात आला. कांदा उत्पादक शेतक-यांनीही कांदा विक्रीस न आणल्याने बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

टी20 विश्व कप विजेता भारतीय टीमचा होईल रोड शो, वानखेडे स्टेडियममध्ये होणार सत्कार

फ्रीज उघडताच लागला विजेचा झटका, आई आणि मुलीचा मृत्यू

Monsoon Update: मुसळधार पावसाचा इशारा, येत्या 24 तासांत या राज्यांमध्ये कोसळणार पाऊस

‘लष्कराकडून 1 कोटींची मदत मिळाली नाही,’ स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या अग्निवीराचे कुटुंबीय म्हणतात...

विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे होतील महाराष्ट्रचे मुख्यमंत्री, सीट शेयरिंग पूर्वीच नेत्याने दिला जबाब

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्र: गुप्त धनाचा लोभ, नरबळी देण्यासाठी चालली होती अघोरी पूजा

स्वामी विवेकानंद पुण्यतिथी

Maharashtra: अंगणवाडी मध्ये मिळणाऱ्या जेवणाच्या पॅकेटात निघाला मेलेला साप

मराठा आरक्षणला घेऊन आली मोठी बातमी

हाथरस चेंगराचेंगरी : या दुर्घटनेमुळे वादात अडकलेल्या बाबांनी प्रसिद्ध केलं पत्र, काय म्हटलं?

पुढील लेख
Show comments