Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लिलाव सुरू करा अन्यथा कारवाई करू; सहकार विभागाची व्यापाऱ्यांना नोटीस

Webdunia
सोमवार, 11 डिसेंबर 2023 (07:56 IST)
नाशिक  - कांद्यावर निर्यात बंदी लावल्यानंतर सुरू झालेल्या बंदवर तोडगा काढण्यासाठी म्हणून आता सहकार विभागाने व्यापाऱ्यांना तीन दिवसानंतर लिलाव सुरू करा अन्यथा कारवाई करू असा इशारा दिला आहे.
 
केंद्रीय आरोग्य मंत्री भरती पवार यांच्या निवासस्थानी जाणारा प्रहार संघटनेचा मोर्चा पोलिसांनी नाशिक शहराच्या वेशीवर अडून त्यांना परत माघारी पाठविले. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, केंद्र सरकारने नागरिकांना योग्य दरामध्ये कांदा मिळावा म्हणून हा निर्णय घेतला आहे.
 
केंद्र सरकारने गुरुवारी मध्यरात्री लागू केलेल्या निर्यात बंदी नंतर शुक्रवारी यावरून मोठ्या प्रमाणावर नाशिक जिल्ह्यामध्ये उद्रेक सुरू झाला. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी कमी भाव मिळत असल्यामुळे बाजार समिती मध्ये सुरू असलेले कांद्याचे लिलाव बंद पाडले तर व्यापाऱ्यांनी देखील यावर नाराजी व्यक्त करून लिलाव प्रक्रियेमध्ये ते सहभागी झाले नाही. या सर्व घटनेची दखल घेऊन रविवारी सहकार विभागाने व्यापाऱ्यांना लिलाव प्रक्रिया सुरू करावी अन्यथा कायदेशीर कारवाई करू असा इशारा दिला आहे.
 
यापूर्वी देखील ज्यावेळी कांद्याचे किंवा अन्य भाजीपाल्यांचे लिलाव बंद पडले त्यावेळी देखील व्यापाऱ्यांना अशा स्वरूपाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा या नवीन वादामध्ये सहकार विभागाने उडी घेऊन कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.या कारवाईच्या इशाऱ्या नंतर व्यापारी आता सोमवारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सुकेश चंद्रशेखरला मुंबई उच्च न्यायालयातून जामीन

World Cup मुळे खुश असलेले CM एकनाथ शिंदे, इंडियन टीमला बक्षीस म्हणून देतील एवढे करोड रुपये

मुंबई पोलिसांच्या एका 47 वर्षीय कॉन्स्टेबलची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

ऋषी सुनक यांनी पराभवानंतर का मागितली माफी?

सूर्याचा हातात बॉल बसला नसता तर मी त्याला संघाच्या बाहेर केले असते- रोहित शर्मा

सर्व पहा

नवीन

Paris Olympics 2024: नीरज चोप्रा ऑलिम्पिकमध्ये 28 सदस्यीय ऍथलेटिक्स संघाचे नेतृत्व करणार

चीन ने तैवानच्या सीमेवर लष्करी विमाने पाठवली,तैपेईने इशारा दिला

देशात मेंदू खाणाऱ्या अमिबाचा संसर्ग वाढला असून, आतापर्यंत 22 जण मृत्युमुखी

Hathras Stampede : हातरस चेंगराचेंगरीचा मुख्य आरोपी मधुकरला अटक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वचषक जिंकून देणाऱ्या या भारतीय खेळाडूंचा गौरव केला

पुढील लेख
Show comments