Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सर्वच आघाड्यांवर राज्याची घसरण

Webdunia
शुक्रवार, 6 मार्च 2020 (10:14 IST)
राज्य सरकारकडून गुरुवारी विधिमंडळात राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. या अहवालानुसार उद्योग, सेवा क्षेत्र, रोजगार अशा सर्वच आघाड्यांवर राज्याची घसरण झाली आहे. तर आर्थिक मंदीमुळे राज्याचा जीडीपीही ७.५ टक्क्यांवरून ५.७ टक्क्यांपर्यंत खाली घसरल्याची बाब अहवालातून समोर आली आहे. गेल्यावर्षी कृषी क्षेत्राचा विकासदर उणे २.२ टक्के होता. यामध्ये यंदा ३.१ टक्क्यांची वाढ झाल्याने महाराष्ट्राला काहीप्रमाणात दिलासा मिळाला आहे.
 
तर देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात बेरोजगारीचे प्रमाणही जास्त असल्याची बाब अहवालातून समोर आली आहे. २०१८-१९ या वर्षात महाराष्ट्रात ७३ लाख ५० हजार रोजगार उपलब्ध होते. गेल्या वर्षभरात यामध्ये घट होऊन रोजगाराचा आकडा ७२ लाख ३ हजारावर आला आहे. याचा अर्थ राज्यातील रोजगारात १ लाख ४७ हजारांची घट झाली आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात बेरोजगारीचे प्रमाण खूपच जास्त आहे. दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र हा देशात पाचव्या क्रमांकावर असल्याची बाब अहवालातून समोर आली आहे.  हरियाणा, कर्नाटक, तेलंगणा आणि तामिळनाडू या राज्यांतील नागरिकांचे दरडोई उत्पन्न महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे.
 
याशिवाय, उद्योग क्षेत्रातही महाराष्ट्राची घसरण झाली आहे. २०१८-१९ मध्ये उद्योग क्षेत्राची वाढ ७.१ टक्के इतकी होती. ही वाढ २०१९-२० मध्ये तब्बल दीड टक्क्यांनी कमी होऊन ५.५ टक्क्यांपर्यंत खाली येण्याचा अंदाज आहे. तसेच विदेशी गुंतवणुकीत घट झाली आहे.

संबंधित माहिती

पाण्यासाठी महिलांना विहिरीत उतरावे लागत आहे, नाशिकमधील जलसंकटाचा व्हिडिओ पहा

EVM खराब असेल तर राजीनामा द्या- राहुल गांधींच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पलटवार

मुंबईत कॉलेजने हिजाबवर बंदी घातली, 9 विद्यार्थिनींनी ठोठावला मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा

पंकजा मुंडे पराभूत झाल्यामुळे 4 समर्थकांनी आत्महत्या केली, ढसाढसा रडल्या भाजप नेत्या

मुंबईमध्ये बळी दिल्याजाणार्या बकरीवर लिहले 'राम', तीन जणांना विरुद्ध गुन्हा दाखल, दुकान सील

पश्चिम बंगालमध्ये मोठा रेल्वे अपघात, कंचनगंगा एक्सप्रेसला धडकली मालगाडी

"EVM मध्ये शिवसेनायुबीटीचे उमेदवार 1 मताने पुढे होते", मुंबई उत्तर-पश्चिम सीट रिजल्टवर झालेल्या गोंधळावर संजय निरुपमांचा पलटवार

'जर 400 पार असता तर हिंदू राष्ट्र बनला असता भारत', BJP नेता राजा सिहांचा मोठा जबाब

महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयात प्रत्येक आजारावर होईल मोफत उपचार, मिळेल चांगली आरोग्य सेवा

Bangladesh vs Nepal : बांगलादेशने नेपाळला हरवून सुपर-8 मध्ये प्रवेश केला, भारताशी होणार सामना

पुढील लेख
Show comments