केंद्र सरकारने पीएम-पोषण योजना सुरू केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे देशभरातील 11.2 लाखांहून अधिक सरकारी आणि सरकारी अनुदानित शाळांच्या विद्यार्थ्यांना फायदा होण्याची अपेक्षा आहे. योजनेअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन सुनिश्चित केले जाईल.