Dharma Sangrah

आशिया चषक क्रिकेट स्पर्धा,आजपासून सुरुवात

Webdunia
शनिवार, 15 सप्टेंबर 2018 (09:46 IST)
सहा देशांचा सहभाग असलेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचा प्रारंभ शनिवार अर्थात आजपासून बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याने होणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने विश्रांती घेतली आहे. गेल्या काही वर्षांत बागंलादेशने या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. २०१६ मध्ये मायभूमीत झालेल्या स्पर्धेत त्यांनी अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती. तसेच २०१२मध्येसुद्धा त्यांनी मश्रफी मोर्तझाच्या नेतृत्वाखाली अंतिम फेरीत मजल मारली होती. बागंलादेशची फलंदाजी अनुभवी तमिम इक्बाल आणि शकिब-अल-हसन यांच्यावर प्रामुख्याने अवलंबून आहे.
 
दुसरीकडे श्रीलंकेला गेल्या दोन वर्षांत भारताकडून तिन्ही प्रकारात सपशेल शरणागती पत्करावी लागली. अनुभवी अष्टपैलू अँजेलो मॅथ्यूज, उपुल थरंगा, थिसारा परेरा आणि लसिथ मलिंगावर श्रीलंकेची भिस्त आहे. त्याशिवाय युवा खेळाडू अकिला धनंजया, दसून शनाका आणि कसुन रजिथा यांच्याकडे ही सर्वाच्या नजरा आहेत. 
 
सामन्याची वेळ : सायं. ५ वा. थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ आणि ३.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

IND vs AUS: भारतीय संघाने तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा सामना १७ धावांनी जिंकला

राहुल चहर आणि ईशानीचे लग्न संपुष्टात आले, सोशल मीडियावर घटस्फोटाची माहिती दिली

पाकिस्तान हॉकी कर्णधारावरील दोन वर्षांची बंदी उठवली

मोहम्मद नबीने 41 व्या वर्षी आयसीसी स्पर्धेत इतिहास रचला

Women's Asia Cup Rising Stars भारताने श्रीलंकेला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला

पुढील लेख
Show comments