Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

IND vs SL: 'सूर्यकुमार यादवला वगळून BCCIने चूक केली', यूजर्स

Webdunia
मंगळवार, 10 जानेवारी 2023 (11:53 IST)
नवी दिल्ली. टीम इंडिया मंगळवार, 10 जानेवारीपासून आयसीसी वनडे विश्वचषक 2023 ची तयारी सुरू करणार आहे. भारतीय संघ श्रीलंकेविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात करणार आहे. मालिकेतील पहिला सामना गुवाहाटी येथे होणार आहे. सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने प्लेइंग इलेव्हनबाबत खुलासा केला होता, ज्यानंतर त्याला यूजर्सच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. रोहित शर्माने स्पष्टपणे सांगितले की, शेवटच्या एकदिवसीय सामन्यात सर्वात वेगवान द्विशतक झळकावल्यानंतरही ईशान किशनला प्रतीक्षा करावी लागेल.

रोहित शर्मा म्हणाला, “आम्ही ईशानला खेऊ देऊ शकत नाही हे दुर्दैव आहे. गेल्या आठ-नऊ महिन्यांत आमच्यासाठी ज्या प्रकारे गोष्टी घडल्या आहेत आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये आमच्यासाठी ज्या प्रकारे परिस्थिती आहे, ते पाहता शुभमन गिलला संधी देणे योग्य ठरेल आणि त्याने त्या स्तरावर अत्यंत चांगली कामगिरी केली आहे. रोहितने स्पष्ट केले की फॉर्म महत्त्वाचा आहे, परंतु फॉर्मेट देखील आहे आणि म्हणूनच त्याने नाव न घेता श्रेयस अय्यरला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल असे संकेत दिले. ऋषभ पंतचा कार अपघात होण्याच्या खूप आधी, लोकेश राहुलकडे वनडे फॉरमॅटमध्ये यष्टिरक्षकाची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, जेणेकरून विश्वचषकापूर्वी पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना तो संघातील स्थान वाचवू शकेल.
   
   श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन प्लेइंग इलेव्हनचा भाग नसल्याचं रोहित शर्माच्या वक्तव्यावरून स्पष्ट झालं आहे. रोहित शर्मा आणि शुभमन गिल सलामी देतील. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली, चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर. यष्टिरक्षक-फलंदाज केएल राहुल पाचव्या तर अष्टपैलू हार्दिक पंड्या सहाव्या क्रमांकावर असेल. यानंतर संघात गोलंदाजांसाठी जागा आहे. रोहित शर्माच्या या निर्णयामुळे सोशल मीडियावरील यूजर्स चांगलेच संतापले आहेत. शेवटच्या एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावणारा इशान किशन आणि श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या टी-20 सामन्यात नाबाद शतक झळकावणारा सूर्यकुमार यादव यांचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश न केल्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यासाठी यूजर्स केएल राहुलला जबाबदार धरत आहेत. या सामन्यात इशान किशनला यष्टिरक्षण करायला हवे, जेणेकरून इशान आणि सूर्या या दोघांचाही प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करता येईल, असे युजर्सचे म्हणणे आहे.
Edited by : Smita Joshi

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

बीसीसीआयने हर्षित राणाला 100 टक्के दंड ठोठावला

LSG vs MI: रोमहर्षक सामन्यात लखनौने मुंबईचा चार गडी राखून पराभव केला

T20 WC: T20 विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर,केएल राहुलला संघातून वगळले

MI vs LSG : भारतीय संघ निवडीपूर्वी लखनौ-मुंबई सामना,संभाव्य प्लेइंग-11 जाणून घ्या

IPL 2024: फिल सॉल्टने सौरव गांगुलीचा मोठा विक्रम मोडला

पुढील लेख
Show comments