Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

IND vs PAK : भारताने केला पाकिस्तानचा 6 धावांनी पराभव

Webdunia
सोमवार, 10 जून 2024 (08:06 IST)
T20 विश्वचषक 2024 च्या 19 व्या सामन्यात भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सामना होत होता. हा सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 119 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ 20 षटकांत 7 गडी गमावून 113 धावाच करू शकला.
 
भारताने रोमहर्षक सामन्यात पाकिस्तानचा सहा धावांनी पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ 19 षटकांत 119 धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ मजबूत स्थितीत दिसत होता. एकवेळ 14व्या षटकात पाकिस्तानची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात 80 धावा होती. यानंतर सामन्याला कलाटणी मिळाली. रिझवान-शादाब बाद झाले. जसप्रीत बुमराह 19व्या षटकात गोलंदाजीला आला आणि त्याने केवळ तीन धावा देत इफ्तिखारची विकेट घेतली. 20व्या षटकात पाकिस्तानला विजयासाठी 18 धावांची गरज होती.

मात्र, अर्शदीपने केवळ 11 धावा देत इमाद वसीमची विकेट घेतली. अशा प्रकारे टीम इंडियाने अशक्य गोष्टीला शक्य मध्ये बदलले. टीम इंडियाचा पराभव निश्चित वाटत होता, पण बुमराह-अर्शदीप, सिराज आणि हार्दिकच्या वेगवान गोलंदाजीच्या चौकडीने भारताला विजय मिळवून दिला. पाकिस्तान संघाला 20 षटकांनंतर 7 बाद 113 धावा करता आल्या. भारताकडून बुमराहने तीन विकेट घेतल्या आणि त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. तर हार्दिकने दोन विकेट घेतल्या. तर अर्शदीप आणि अक्षर यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

Edited by - Priya Dixit  
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रवींद्र जडेजानेही आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली

प्रेयसीचा बलात्कार करून खून करणाऱ्या आरोपीची पोलीस ठाण्याच्या शौचालयात आत्महत्या

अर्जुनाच्या लक्षाप्रमाणे आमचे लक्ष पण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीकडे आहे, शरद पवारांचे वक्तव्य

देवेंद्र फडणवीस यांनी टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन बनवल्याबद्दल केले अभिनंदन, म्हणाले-

शिंदे सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केली 'तीर्थ यात्रा योजना

सर्व पहा

नवीन

रवींद्र जडेजानेही आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय संघाशी फोनवर संवाद साधला, हार्दिक-सूर्याचे कौतुक केले

रोहितने वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर बार्बाडोसच्या मैदानातून माती उचलून चाखली चव, व्हिडीओने मने जिंकली

रोहित शर्मा : टी20 कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणारा, भारतासाठी आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवणारा कर्णधार

रोहित शर्मा : 'टॅलेंट ते वाया गेलेलं टॅलेंट' आणि आता 'जगज्जेता कर्णधार', असा आहे 'हिटमॅन'चा प्रवास

पुढील लेख
Show comments