Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

India vs Sri Lanka : मालिकेतील वेळापत्रकात बदल, बीसीसीआयने केली ही मोठी घोषणा

Webdunia
मंगळवार, 15 फेब्रुवारी 2022 (20:23 IST)
बीसीसीआयने सोमवारी श्रीलंकेच्या भारत दौऱ्यातील बदल जाहीर केले. नव्या वेळापत्रकानुसार 24 फेब्रुवारीपासून तीन सामन्यांची टी-20 मालिका सुरू होणार आहे. मालिकेतील पहिला सामना लखनौमध्ये खेळवला जाईल, तर पुढचे दोन सामने धर्मशाला येथे होणार आहेत. टी-20 मालिकेनंतर दोन सामन्यांची कसोटी मालिकाही खेळवली जाणार आहे. पहिला कसोटी सामना 4 मार्चपासून मोहालीत तर दुसरा कसोटी सामना 12 मार्चपासून बेंगळुरूमध्ये खेळवला जाणार आहे. दुसरा सामना दिवस रात्र खेळवला जाईल.
 
जुन्या वेळापत्रकानुसार श्रीलंकेच्या भारत दौऱ्याची सुरुवात 25 फेब्रुवारीला होणार्‍या पहिल्या कसोटी सामन्याने होणार होती. पहिला कसोटी सामना बेंगळुरू येथे तर दुसरा कसोटी सामना मोहाली येथे 5 मार्चपासून होणार आहे. कसोटी मालिकेनंतर टीम इंडियाला तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळायची होती. पहिला T20 मोहालीत, दुसरा धर्मशाला आणि तिसरा लखनौमध्ये खेळवला जाणार होता.
 
मात्र, श्रीलंकेविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी भारताने अद्याप कोणत्याही फॉरमॅटसाठी संघ जाहीर केलेला नाही. या संघासोबतच बीसीसीआय कसोटी संघाच्या नव्या कर्णधाराचीही घोषणा करणार आहे.
 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

RR vs DC : आज ऋषभ पंत साठी करो या मरोचा सामना, प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी दिल्लीचा जिंकण्याचा प्रयत्न असणार

युवराज सिंहने रोहित शर्माच्या इंग्लिशची उडवली खिल्ली, सोशल मीडियावर व्हायरल झाला जबाब

SRH vs MI :मुंबईने हैदराबादचा सात गडी राखून पराभव केला

IND vs BAN Women's T20: भारतीय महिला संघाचा बांगलादेशविरुद्ध सलग चौथा विजय

पुढील लेख
Show comments