Festival Posters

हुश्श, दुबळ्या हाँगकाँगला हरविले

Webdunia
बुधवार, 19 सप्टेंबर 2018 (09:24 IST)
आशिया कप क्रिकेट स्पर्धेत भारताने सलामीच्या लढतीत हाँगकाँगवर २६ धावांनी कसाबसा विजय मिळवला. सलामीवीर निझाकत खान (९२) आणि कर्णधार अंशुमन रथ (७३) यांनी १७४ धावांची सलामी भागीदारी करून भारताच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. पण हे दोघे बाद झाल्यानंतर हाँगकाँगच्या डावाला उतरती कळा लागली आणि भारताने सामना जिंकला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या खलील अहमदने आणि युझवेंद्र चहलने सर्वाधिक प्रत्येकी ३-३ बळी टिपले.
 
भारताच्या तुलनेत दुबळ्या मानल्या जाणाऱ्या हाँगकाँगच्या सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांना रडवले. या दोघांनी १७४ धावांची सलामी भागीदारी केली. त्यामुळे एका क्षणी भारत हा सामना गमावतो की काय, अशी स्थिती होती. मात्र त्यानंतर हे दोघेही पाठोपाठ बाद झाले. निझाकत खानचे शतक ८ धावांनी हुकले. तो तिसऱ्यांदा नववंडीत बाद झाला. तर कर्णधार अंशुमन रथदेखील चुकीचा फटका खेळताना बाद झाला. त्यानंतर मात्र कोणत्याही फलंदाजाला डाव सावरणे जमले नाही. ठराविक अंतराने बळी टिपण्यात भारतीय गोलंदाज यशस्वी ठरले. भारताकडून खलील अहमद आणि युझवेन्द्र चहल यांनी प्रत्येकी ३ तर कुलदीप यादवने २ बळी टिपले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

MI vs PBKS : पंजाबचा मुंबईवर सात गडी राखून दणदणीत विजय

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरविरुद्धच्या सामन्यादरम्यान या गाण्यामुळे चेन्नई सुपर किंग्स संतप्त

दुखापतग्रस्त अथर्व अंकोलेकरच्या जागी आयपीएलच्या उर्वरित सामन्यांसाठी क्रिश भगतला संघात स्थान

विनोद कांबळीच्या आरोग्याला मोठा धोका; माजी भारतीय क्रिकेटपटू आयुष्यातील सर्वात कठीण टप्प्यातून जात आहे

IND vs SA: भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघांमध्ये पाच सामन्यांची टी२० मालिका सुरू होणार

पुढील लेख
Show comments