सलामीची फलंदाज मिताली राज ही ऑस्ट्रेलियाविरुध्द वडोदरा येथे 12 ते 18 मार्च दरम्यान होणार्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिकेत भारताच्या 15 सदस्यीय महिला संघाचे नेतृत्व करणार आहे.
बीसीसीआयचे कार्यवाहक सचिव अमिताभ चौधरी यांनी सांगितले की, अखिल भारतीय महिला निवड समितीने ऑस्ट्रेलियाविरुध्द होणार्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी भारताच्या महिला संघाची निवड केली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यत्यामध्ये पहिला एकदिवसीय सामना 12 मार्च रोजी तर पुढील दोन सामने 15 आणि 18 मार्च रोजी खेळले जाणार आहे. बीसीसीआयने सांगितले की, एकदिवसीय मालिकेनंतर टी-20 आंतरराष्ट्रीय त्रिकोणी मालिका खेळली जाईल. त्यासाठी संघाची घोषणा नंतर केली जाईल.