Dharma Sangrah

आधार कार्ड वापरत नसाल तर होईल डिअॅक्टिवेट, जाणून घ्या UIDAI चे नियम

Webdunia
प्रत्येक भारतीय नागरिकासाठी आधार कार्ड एक महत्त्वपूर्ण कागदपत्र आहे. आधार कार्ड कागदपत्र नाही तर ओळख पत्र देखील आहे. कोणत्याही वित्तीय देणंघेणं आणि शासकीय योजनांचा लाभ 
 
घेण्यासाठी आधार अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आधार कार्डाचा एक नियम आपल्यासाठी जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. 
 
UIDAI अनुसार, जर एखादा नागरिकाने तीन वर्षांपर्यंत आपला आधार वापरले नाही तर आधार डिअॅक्टिवेट अर्थात बंद होईल.
 
जाणून घ्या नियम
यूआईडीएआई अनुसार जर तीन वर्ष आधार वापरले नाही तर आधार कार्ड बंद करण्यात येतं. आधार कार्ड आपण शासकीय स्कीम्सचा लाभ घेण्यासाठी, पेन्शन सुविधेचा लाभ घेण्यासाठी, ईपीएफओ डिटेल्स देण्यासाठी, पॅन कार्डला लिंक करण्यासाठी व इतर कामांसाठी वापरू शकता.
 
आपला कार्ड निष्क्रिय तर झाला नाही
आपण घरी बसल्या आपल्या आधार कार्डाचे स्टेटस तपासू शकता. यासाठी आपल्याला यूआईडीएआई च्या वेबसाइटवर विजिट करावं लागेल. uidai.gov.in यावर क्लिक करून आपला आधार सर्व्हिसेज पर्याय निवडा, नंतर 'वेरिफाय आधार नंबर' वर आपला आधार नंबर टाका. आपण आधार नंबर टाईप केल्यावर आपल्या समोर हिरवा किंवा लाल रंगाचा चिन्ह येईल. चिन्ह हिरवा असल्यास आधार अॅक्टिवेट आहे आणि लाल रंगाचा चिन्ह दिसल्यास आधार कार्ड डिअॅक्टिवेट झाला आहे.
 
या प्रकारे करा अॅक्टिवेट
आपला आधार कार्ड डिअॅक्टिवेट आहे आणि आपण याला पुन्हा अॅक्टिवेट करू इच्छित असाल तर आपल्याला सर्व आवश्यक डाक्युमेंट्ससोबत आधार एनरोलमेंट सेंटर जावं लागेल. तेथे जाऊन आपल्याला आधार अपडेट फॉर्म भरावा लागेल, नंतर बायोमेट्रिक वेरिफाय केलं जाईल. नंतर आपला आधार अॅक्टिवेट होईल. यासाठी आपल्याला फीस देखील भरावी लागेल. 
 
आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आपल्याला एनरोलमेंट सेंटर मध्ये 50 रुपये द्यावे लागतील. या व्यतिरिक्त या प्रक्रियेत आपल्याला आपला एक वैध मोबाइल नंबर देखील द्यावा लागेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होणार, संजय राऊतांचे वक्तव्य, गिरीश महाजनांनी टोला लगावला

LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात

कल्याण येथे डंपर आणि इको कारच्या भीषण रस्ते अपघातात ११ जणांचा मृत्यू

Shocking अहमदाबादच्या 'डोसा मृत्यू' प्रकरणात धक्कादायक खुलासा: मुलाच्या हव्यासापोटी जोडप्यानेच मुलींना विष दिले का? डायरीमुळे उलगडले रहस्य

फडणवीस मंत्रिमंडळाचा आशा भोसले यांच्या नावाने संगीत अकॅडमी स्थापन करण्याचा निर्णय

पुढील लेख
Show comments