Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

माणसाने 22 हजार वर्षांपूर्वी द्राक्षे खाण्यास केली सुरुवात

Webdunia
माणसाने भातशेती कधी सुरु केली किंवा ती कुठे सुरु केली, याबाबतचे एक संशोधन अलीकडेच झाले आहे. आता माणसाने द्राक्षे खाण्यास कधी सुरुवात केली याबाबतचे संशोधन करण्यात आले आहे. उत्तर अमेरिका आणि युरोपच्या बहुतांश भागातून ज्यावेळी बर्फाचे साम्राज्य हट गेले त्यावेळी द्राक्षांचे उत्पादन वाढू लागले आणि माणसाने त्यांचा आहारात वापर सुरु केला. असे या संशोधकांचे म्हणणे आहे. ज्या काळात द्राक्षाचा वापर माणसाने शेतातील पिकांसारखा सुरु केला. त्यापूर्वी किमान पंधरा हजार वर्षे आधीच माणसाने या फळाची चव चाखण्यास सुरुवात केली होती.
 
कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीचे ब्रँडन गॉट यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, बहुतांश पिकांप्रमाणेच द्राक्षांची शेतीही समारे सात ते दहा हजार वर्षांपूर्वी सुरु झाली. मात्र, त्यावेळेपासूनच माणसाच्या आहारात द्राक्षे आले असे नव्हे. त्यापूर्वी अनेक वर्षांपासून माणसाला द्राक्षांची चव माहिती होती. द्राक्षांची शेती सुरु होण्यापूर्वी अनेक शतके आधीच जंगलात नैसर्गिकरित्या निर्माण होणार्‍या द्राक्षांचा माणसाने खाण्यासाठी वापर करण्यास सुरुवात केली होती.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments