Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारतात कामगार दिन केव्हापासून साजरा केला जातो

Webdunia
शनिवार, 1 मे 2021 (13:56 IST)
भारतात लेबर किसान पार्टी ऑ‍फ हिंदुस्तान या पार्टीच्या वतीने 1 मे 1923 रोजी या मे दिनाचा पहिला उत्सव चेन्नई येथे आयोजित करण्यात आला होता. या कामगार दिनाचे प्रतीक असलेला लाल ध्वज देखील भारतात तेव्हाच प्रथम वापरण्यात आला होता.
 
या पक्षाचे नेते सिंगारावेलु चेतियार यांनी मे डे उत्सव दोन ठिकाणी आयोजित केले होते- एक म्हणजे मद्रास उच्च न्यायालयासमोर समुद्रकिनार्‍यावर व दुसरे ट्रिप्लिकेन बीचवर.
 
नंतर त्यांनी या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले व त्यांच्या अध्यक्षतेखाली कामगारांसाठी प्रासंगिक सुट्टी जाहीर करण्याचा ठराव येथे पारित करण्यात आला. त्याचबरोबर या सभेत पक्षाच्या अहिंसक तत्त्वांचे स्पष्टीकरण देणारे इतर काही मुद्दे, जगातील कामगारांना काही आर्थिक मदतीसाठी व स्वातंत्र्य मिळविण्यासाठी विनंतीवर देखील चर्चा झाली.
 
याच्या तीन वर्षानंतर फ्रेंच समजावादी पार्टीने देखील कामगार चळवळीचा व गवत बाजार येथील नरसंहाराचे स्मारक म्हणून एक मेला आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून निवडले
 
कम्युनिस्ट व समाजवादयी राजयकीय पक्षांच्या कामगार जळवळींना हा दिवस जोडला गेला आहे. कामगार दिनाला हिंदीमध्ये कामगार दिन किंवा आंतरराष्ट्रीय श्रमिक दिवस, मराठीत कामगार दिवस व तामिळमध्ये उझीपल्लार नाल म्हणून ही ओळखले जाते.
 
त्याचप्रमाणे 1960 साली भाषेच्या आधारावर गुजरात व महाराष्ट्र यांच्या सीमा ठवल्या जाऊन ही दोन राज्ये स्वतंत्र झाली. तो दिवस 1 मे च असल्याने एक मे हा दिवस गुजरात दिन व महाराष्ट्र दिन म्हणून देखील ओळखला जातो.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments