Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Rabindranath Tagore Quotes in Marathi रवींद्रनाथ टागोर यांचे सुविचार

Webdunia
मंगळवार, 7 मे 2024 (12:09 IST)
आपण धोक्यांपासून सुरक्षित राहावे अशी प्रार्थना न करता त्यांना तोंड देत असताना निर्भय होण्यासाठी प्रार्थना करुया.
 
आपण आपल्याला पटलेल्या तत्त्वाप्रमाणे वागावे आणि दुसऱ्यालाही वागू द्यावे.
 
आम्ही महानतेच्या सर्वात जवळ तेव्हा असतो जेव्हा आम्ही नम्रपणात महान असतो.
 
आपण सर्व श्रेष्ठाची निवड करू शकत नाही सर्व श्रेष्ठ आपली निवड करते.
 
कला हि जीवनाची दासी आहे, तिचे कार्य जीवनाची सेवा करणे हे आहे.
 
मातीच्या बंधनापासून मुक्ती झाडासाठी आजादी नव्हे.
 
कलाकार हा निसर्ग प्रेमी असतो त्यामुळे तो निसर्गाचा दासही असतो आणि स्वामीही असतो.
 
नेहमी तर्क करणारा विचार धारदार चाकू समान आहे जो वापरणार्‍याच्या हातातून रक्त काढतोचं.
 
जीवन म्हणजे एक अनंत आव्हान, प्रदीर्घ साहस व पात्रतेची कसोटी आहे.
 
जे चांगले आहे ते काही एकट्यानेच येत नाही ते सर्व मंगल गोष्टी सोबत घेवून येते.
 
चंद्र आपला प्रकाश संपूर्ण आकाशात पसरवतो परंतू कलंक स्वत:जवळ ठेवतो.
 
जेव्हा आम्ही नम्रते मध्ये महान होतो, तेव्हा आम्ही महानतेच्या निकट जातो.
 
जो मनुष्य आपल्या मनाची वेदना – मनातली दु:ख स्पष्टपणे दुसऱ्यांना सांगू शकत नाही त्याला अधिक राग येत असतो.
 
फक्त प्रेमच वास्तविकता असते, ती केवळ भावना नसते. हे एक परम सत्य आहे जे सृष्टीच्या हृदयात राहतं.
 
मानवी जीवन नितीनिरपेक्ष कधीच असू शकत नाही त्याला नीतीचा पाया असलाच पाहिजे.
 
ज्याप्रमाणे पक्ष्यांचे आश्रय स्थान घरटे असते, त्याचप्रमाणे आपल्या वाणीचे आश्रय स्थान मौन असते.
 
आत्म्यामध्ये परामात्यामाचा साक्षात्कार प्राप्त करणे हेच जीवनाचे ध्येय असते.
 
थोडे वचने पण अधिक विचार करणे, थोडे बोलणे पण अधिक ऐकणे हाच बुद्धिमान बनण्याचा उपाय आहे.
 
निर्भीड नव जीवनाच्या दिशेने चला.
 
विश्वास हा असा पक्षी आहे कि, जो उष:कालापुर्वीच्या अंधारात प्रकाशाचा अनुभव घेत असतो.
 
एखाद्या मुलाचे शिक्षण आपल्या ज्ञानापुरते मर्यादित ठेवू नका कारण त्याचा जन्म दुसर्‍या वेळी झाला आहे.
 
परमेश्वराच्या महान शक्तीचे दर्शन वादळ वाऱ्यात होत नसून ते वाऱ्याच्या झुळके च होते.
 
पात्रता नाही म्हणून आपण परस्परांना भेटणे बंद केले तर आपल्यापैकी बर्‍याच जणांना अज्ञातवासात जावे लागेल.
 
पात्रातील पाणी नेहमी चमकत असते आणि समुद्राचे पाणी नेहमीच गडद असते. लघु सत्याचे शब्द नेहमीच स्पष्ट असतात, महान सत्य मौन असतं.
 
पायदळी चुरगळलेली फुले, चुरगळा ना ऱ्या पायाला आपण सुगंध अर्पण करतात. खऱ्या क्षेमेचे हेच कारण आहे.
 
प्रकाश जेव्हा काळ्या ढगांना स्पर्श करतो तेव्हा तो स्वर्गाचे फुल बनवतो.
 
प्रांतीय आणि जातीय भावना मनात आणू न देता व्यक्ती व्यक्तींनी भेदभाव विसरायला हवा आणि आपण सगळे एक आहोत हीच भावना मनात बाळगावयास हवी.
 
फुलांच्या पाकळ्या तोडणाऱ्याला फुलांचे सौंदर्य कधीच अनुभवता येत नाही.
 
महत्त्वाकांक्षेच्या लतेला पाणी घातल्याशिवाय यशाची मधुर फळे हाती लागत नाही.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments