Festival Posters

व्यक्ति‍‍विशेष : राजीव गांधी

Webdunia
मंगळवार, 21 मे 2019 (14:21 IST)
राजीव गांधी यांचा जन्म 20 ऑगस्ट 1944 रोजी मुंबई येथे झाला. हे भारताचे सातवे पंतप्रधान होते. इंदिरा गांधी आणि फिरोज गांधींचे ते ज्येष्ठ पुत्र होते. इंदिरा गांधींच्या निधनानंतर राजीव गांधींनी पंतप्रधान पदाची सूत्रे हातात घेतली तेव्हा ते भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले. राजीव गांधी राजकारणात येण्यापूर्वी इंडियन एअरलाईन्समध्ये वैमानिक होते. आई इंदिरा गांधी या भारताच्या पंतप्रधान असल्या तरी त्यांनी राजकारणातून दूर राहणे पसंत केले होते. दरम्यान इंग्लंडमधील केंब्रिज येथे असताना त्यांची ओळख सोनियांशी झाली व पुढे त्यांचा विवाह झाला. 
 
अखेर 1980 मध्ये भाऊ संजय गांधी यांच्या निधनानंतर राजीवने राजकारणात प्रवेश केला. राजीव गांधींच्या आधुनिक विचारांचा पगडा त्यांच्या सुधारणावादी कामांतून पाहायला मिळाला. संगणक युगाची त्यांनी भारताला ओळख करून दिली. 1988 मध्ये त्यांनी श्रीलंकेत शांतिसेना पाठविण्याचा निर्णय घेतला. त्याची परिणती लिट्टे सोबत संघर्षात झाली. 1991 च्या लोकसभा निवडणुकात एका प्रचार सभेच्या वेळी 21 मे रोजी लिट्टेकडून त्यांची हत्या करण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी सोनिया गांधी व मुलगा राहुल व मुलगी प्रियंका राजकारणात आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: अनोखा विजय; एकाच कुटुंबातील तीन सदस्यांनी वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणूक जिंकली

अनोखा विजय; एकाच कुटुंबातील तीन सदस्यांनी वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणूक जिंकली

महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे ब्रँडचा सूर्यास्त! ४० वर्षांनंतर महापालिका निवडणुकीत बीएमसीचा बालेकिल्ला कोसळला

Bijnor Viral Dog मारुतीच्या मूर्तीभोवती एक कुत्रा चार दिवसांपासून फिरतोय, त्यामागील कारण काय?

महाराष्ट्रात झालेल्या दणदणीत विजयानंतर भाजपने छत्रपती शिवाजी महाराजांची अशा प्रकारे आठवण काढली

पुढील लेख
Show comments