Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

व्यक्ति‍‍विशेष : राजीव गांधी

Webdunia
मंगळवार, 21 मे 2019 (14:21 IST)
राजीव गांधी यांचा जन्म 20 ऑगस्ट 1944 रोजी मुंबई येथे झाला. हे भारताचे सातवे पंतप्रधान होते. इंदिरा गांधी आणि फिरोज गांधींचे ते ज्येष्ठ पुत्र होते. इंदिरा गांधींच्या निधनानंतर राजीव गांधींनी पंतप्रधान पदाची सूत्रे हातात घेतली तेव्हा ते भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले. राजीव गांधी राजकारणात येण्यापूर्वी इंडियन एअरलाईन्समध्ये वैमानिक होते. आई इंदिरा गांधी या भारताच्या पंतप्रधान असल्या तरी त्यांनी राजकारणातून दूर राहणे पसंत केले होते. दरम्यान इंग्लंडमधील केंब्रिज येथे असताना त्यांची ओळख सोनियांशी झाली व पुढे त्यांचा विवाह झाला. 
 
अखेर 1980 मध्ये भाऊ संजय गांधी यांच्या निधनानंतर राजीवने राजकारणात प्रवेश केला. राजीव गांधींच्या आधुनिक विचारांचा पगडा त्यांच्या सुधारणावादी कामांतून पाहायला मिळाला. संगणक युगाची त्यांनी भारताला ओळख करून दिली. 1988 मध्ये त्यांनी श्रीलंकेत शांतिसेना पाठविण्याचा निर्णय घेतला. त्याची परिणती लिट्टे सोबत संघर्षात झाली. 1991 च्या लोकसभा निवडणुकात एका प्रचार सभेच्या वेळी 21 मे रोजी लिट्टेकडून त्यांची हत्या करण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी सोनिया गांधी व मुलगा राहुल व मुलगी प्रियंका राजकारणात आहेत. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments