Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महात्मा गांधी यांच्या हत्येत स्वातंत्र्यवीर सावरकर यांना वाचवले – तुषार गांधी

Webdunia
महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी मोठ्या वादाला पुन्हा वाचा फोडली आहे. महात्मा गांधी यांच्या हत्या झाली या प्रकरणात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना वाचवण्यात आले आहे असे मोठे खळबळजनक वक्तव्य महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केलं आहे. विशेष म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मगाव असलेल्या नाशिकमध्ये त्यांनी हे वक्तव्य केले आहे.परशुराम सायखेडकर सभागृहात डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेत 'महात्मा गांधी से गौरी लंकेश तक, राजकीय हत्याओ का सनातन सत्य' या विषयावर त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते.
 
बापूंच्या हत्या करताना ज्या प्रकारे सर्व घटना क्रम होता तसाच सर्व प्रकार आणि त्याच पद्धतीने डॉ. नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांची हत्या केली आहे. असे गांधी यांनी सांगितले आणि ते पुढे म्हणाले की नथुराम गोडसे बुरखा घालून बापूंना गोळ्या झाडणार होता, मात्र दोन वेळा बुरखा घातला असल्याने त्याला नीट चालता देखील आले नाही सोबतच बंदूक ठेवायला त्याच्या कडे  खिसाही देखील नव्हता असे तुषार गांधींनी यावेळी दावा केला आहे.
 
तुषार गांधी पुढे म्हणाले की, तुम्हाला दाभोळकर बनायचं आहे का? तुम्ही  मॉर्निंग वॉकला जाता का? अशा धमक्या अनेकांना मिळत आहेत, अनेकदा तर मलाही धमकी वजा विचाले की तुम्ही मॉर्निंग वॉकला जातात का? असं तुषार गांधींनी अयावेळी  सांगितले आहे.
 
सुप्रीम कोर्टात याचीक : गांधी हत्या तपास योग्य पद्धतीने व्हावा
 
महात्मा गांधींच्या हत्येचा अयोग्य पद्धतीने झाला आहे, तो नीट झाला नाही. त्यामुळे त्याचा तपास पुन्हा व्हावा अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे ही माहिती तुषार गांधी यांनी यावेळी दिली आहे. 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments