Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दीर्घकाळ बसण्याने होतो स्मृतिभ्रंश

Webdunia
बैठी कामामुळे बर्‍याच आजारांना आवतण मिळत असते. दुर्दैवाने बहुतांश लोकांची कामे बैठीच असतात आणि आपण किती वेळ बसून राहिलो आहे याची त्यांनाही जाणीव होत नसते. दीर्घकाळ असे एकाच जागी बसून राहिल्याने मेंदूतील रक्तपुरवठा मंदावतो. त्याचे परिणाम अतिशय घातक होऊ शकतात. यामुळे स्मृतिभ्रंशाचा धोकाही संभवतो. बैठी काम असले तरी यावरही आपण उपाय काढू शकतो. दर अर्ध्या तासाने दोन मिनिटांसाठी का होईना जर फिरून पाय मोकळे केले तरी त्याचा लाभ होऊ शकतो. अशा चालण्याने मेंदूतील रक्तसंचार सुधारतो. मेंदूत रक्तसंचार होणे ही आपल्या शरीरातील एक सामान्य प्रक्रिया आहे. 

रक्तसंचारामुळेच मेंदूची आठवण्यासारखी प्रक्रिया सुरळीत होऊ शकते. मेंदूत काही मोठ्या रक्तवाहिन्याही असतात. दीर्घकाळ एकाच जागी बसून राहिल्याने अशा वाहिन्यांच्या कार्यातही अडथळा येऊ शकतो.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

पुढील लेख
Show comments